शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 19:11 IST

Ahilyanagar News: राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे २४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता. एक महिन्यानंतर ३० एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बीडीएस (बॉम्ब डिस्पोज स्कॉड) पथकाने घटनास्थळी येऊन त्या बॉम्बचा फ्युज काढून तो निकामी केला.

- आकाश येवलेअहिल्यानगर - राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे २४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता. एक महिन्यानंतर ३० एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बीडीएस (बॉम्ब डिस्पोज स्कॉड) पथकाने घटनास्थळी येऊन त्या बॉम्बचा फ्युज काढून तो निकामी केला. सदर बाॅम्ब गुरुवारी घटना स्थळावरून नेण्यात आला. केके रेंज येथे नेऊन बॉम्बचा विस्फोट केला जाणार असल्याची माहिती सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

दि. २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरातील बांबू प्रकल्पात आकाशातून जाणाऱ्या एका जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरा बसला होता. सदर बॉम्ब पडल्यापासुन वरवंडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल एक महिना होऊन त्या बेवारस बॉम्बची दखल घेतली नाही. परिसरातील नागरीकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिल्ली येथे संरक्षण विभागाला हि माहिती कळविली होती. काल सकाळी पुणे येथील भारतीय थल सेनेचे नायक सुभेदार प्रकाश कोटगी, हवालदार प्रमोद हनमंताचे, हवालदार टी. कन्नन, हवालदार बी. एन. राव हे बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने जेसीबीच्या सहाय्याने सात फूट खड्ड्यातील जिवंत बॉम्ब बाहेर काढला. त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सहकार्य केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नायक सुभेदार कोटगी यांनी केके रेंजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनास्थळी बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस व कृषी विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने बॉम्बचे मोजमाप केले. सदर बाॅम्ब साडेचार फूट लांब, चार फूट व्यास, ४५३ किलो वजनाचा आहे. बॉम्बची पिन निघाली नाही, त्यामुळे बॉम्ब फुटला नाही. अन्यथा एक किलोमीटर परिघातील क्षेत्र उध्वस्त झाले असते. तीन ते चार किलोमीटर पर्यंत भूकंप सदृश हादरे बसले असते. मोठी जीवित व वित्तहानी झाली असती. अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Bombsस्फोटकेAhilyanagarअहिल्यानगर