शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

"मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिलाय, आमच्या हातात काही नाही"; माणिकराव कोकाटेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:23 IST

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत आमच्या हातात काहीच राहिलेले नाही असे म्हटलं आहे.

Manikrao Kokate: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. पीक विमा योजनेतल्या भ्रष्टाचारावरुन बोलताना माणिकराव कोकाटे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आता कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. कोकाटे यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या सरकारच्या कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केलं. आता आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी हे मुख्यमंत्री ठरवतात असं विधाना माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. त्यामुळे आता आम्हाला चांगलं काम करावं लागेल असंही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

आम्हाला आता नीट काम करावंच लागेल - माणिकराव कोकाटे

"बहुमताने आम्ही या ठिकाणी निवडून आलो. निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला की आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचे काम शिस्तीत झालं पाहिजे. त्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारीसुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या पण हातात काही राहिले नाही. त्यामुळे तर आम्हाला आता नीट काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल," असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले तर काय हरकत आहे - प्रवीण दरेकर

माणिकराव कोकाटे यांच्या या विधानानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. "हे सर्व विधान सकारात्मकपणे घ्यायला पाहिजे. चांगल्या कामासाठी काही शिस्त लावली जात असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा मतीतार्थ मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत निगेटिव्ह नव्हता. सकारात्मकतेच्या बाजूने आपल्याला जावं लागणार आहे असा त्याचा अर्थ आहे. मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले तर काय हरकत आहे. लोकांना कामाशी मतलब आहे. जर चांगली यंत्रणा तिथे असेल तेच महाराष्ट्रातील जनतेला तेच हवे आहे. ही जनता खुश होऊन सगळ्यांनाच आशीर्वाद देईल," असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार