शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

"मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिलाय, आमच्या हातात काही नाही"; माणिकराव कोकाटेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:23 IST

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत आमच्या हातात काहीच राहिलेले नाही असे म्हटलं आहे.

Manikrao Kokate: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. पीक विमा योजनेतल्या भ्रष्टाचारावरुन बोलताना माणिकराव कोकाटे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आता कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. कोकाटे यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या सरकारच्या कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केलं. आता आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी हे मुख्यमंत्री ठरवतात असं विधाना माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. त्यामुळे आता आम्हाला चांगलं काम करावं लागेल असंही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

आम्हाला आता नीट काम करावंच लागेल - माणिकराव कोकाटे

"बहुमताने आम्ही या ठिकाणी निवडून आलो. निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला की आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचे काम शिस्तीत झालं पाहिजे. त्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारीसुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या पण हातात काही राहिले नाही. त्यामुळे तर आम्हाला आता नीट काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल," असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले तर काय हरकत आहे - प्रवीण दरेकर

माणिकराव कोकाटे यांच्या या विधानानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. "हे सर्व विधान सकारात्मकपणे घ्यायला पाहिजे. चांगल्या कामासाठी काही शिस्त लावली जात असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा मतीतार्थ मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत निगेटिव्ह नव्हता. सकारात्मकतेच्या बाजूने आपल्याला जावं लागणार आहे असा त्याचा अर्थ आहे. मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले तर काय हरकत आहे. लोकांना कामाशी मतलब आहे. जर चांगली यंत्रणा तिथे असेल तेच महाराष्ट्रातील जनतेला तेच हवे आहे. ही जनता खुश होऊन सगळ्यांनाच आशीर्वाद देईल," असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार