शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

"मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिलाय, आमच्या हातात काही नाही"; माणिकराव कोकाटेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:23 IST

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत आमच्या हातात काहीच राहिलेले नाही असे म्हटलं आहे.

Manikrao Kokate: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. पीक विमा योजनेतल्या भ्रष्टाचारावरुन बोलताना माणिकराव कोकाटे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आता कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. कोकाटे यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या सरकारच्या कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केलं. आता आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी हे मुख्यमंत्री ठरवतात असं विधाना माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. त्यामुळे आता आम्हाला चांगलं काम करावं लागेल असंही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

आम्हाला आता नीट काम करावंच लागेल - माणिकराव कोकाटे

"बहुमताने आम्ही या ठिकाणी निवडून आलो. निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला की आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचे काम शिस्तीत झालं पाहिजे. त्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारीसुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या पण हातात काही राहिले नाही. त्यामुळे तर आम्हाला आता नीट काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल," असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले तर काय हरकत आहे - प्रवीण दरेकर

माणिकराव कोकाटे यांच्या या विधानानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. "हे सर्व विधान सकारात्मकपणे घ्यायला पाहिजे. चांगल्या कामासाठी काही शिस्त लावली जात असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा मतीतार्थ मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत निगेटिव्ह नव्हता. सकारात्मकतेच्या बाजूने आपल्याला जावं लागणार आहे असा त्याचा अर्थ आहे. मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले तर काय हरकत आहे. लोकांना कामाशी मतलब आहे. जर चांगली यंत्रणा तिथे असेल तेच महाराष्ट्रातील जनतेला तेच हवे आहे. ही जनता खुश होऊन सगळ्यांनाच आशीर्वाद देईल," असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार