शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजना ही तर वसुली योजना; 6 हजार 500 कोटींची बेकायदा वसुली - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 23:03 IST

राज्य सरकारच्या ऊर्जा विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी योजना नव्हे तर त्यांच्याकडून वसुली करणारी योजना असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या ऊर्जा विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी योजना नव्हे तर त्यांच्याकडून वसुली करणारी योजना असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 6 हजार 500 कोटी रुपयांची बेकायदेशीर वसुली सरकारतर्फे केली जात असल्याचा आरोप करून या योजनेचा फेर आढावा घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

    मंत्रालयात धनंजय मुंडे यांनी आज या संदर्भात मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन त्यांना यासंदर्भात एक निवेदन दिले. या वर्षी राबवल्या जात असलेल्या कृषी संजीवनी योजनेत असलेले आक्षेप त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिले आहेत. यात 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांची वीज बिलाची थकबाकी वाढवण्यात आली आहे, यापुर्वीच्या कृषी संजीवणी योजनेत थकीत मुद्दल रक्कमेत 50 टक्के सुट देण्यात आली होती, ती नविन योजनेत काढुन टाकण्यात आली आहे. मुळ विज बीलात वाढीव जोडभार लावुन बील आकारण्यात आले आहे. ट्रान्सफार्मर बंद कालावधी, कंपनीकडून होणारे ब्रेक डाऊन, स्थानिक दोष, दुरूस्ती, देखभाल या कालावधीतील बिल आकारणी रद्द केली पाहीजे, वीज पुरवठा 8 ते 10 तास होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात 5 ते 7 तास कमी झालेला आहे, बंद काळातील आकारणी कमी होणे आवश्यक आहे. कंपनीच्या सरासरी आणि वाढीव बिलासंबंधीच्या वाणिज्य परिपत्रक क्र.254 दि.7 डिसेंबर 2015 मधील तरतूदींची अंमलबजावणी केली जात नाही, विद्युत पुरवठा संहिता विनियमन क्र.14.3 चा भंग करण्यात येवुन अनेक वेळा सरासरी जादा वापर दाखवुन बिलिंग करण्यात आलेले असल्याबाबत त्यांनी पत्रात आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. 

    शासनाने मार्च 2017 अखेर दाखवलेली 10 हजार 890 कोटी रुपयांची थकबाकी प्रत्यक्षात वरील आक्षेपांचा विचार केल्यास ती सुध्दा सुधारित होऊन 3 हजार 250 कोटी रुपये अशी सुधारित होईल. त्यामुळे या येाजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 6 हजार 500 कोटी रुपयांची अतिरिक्त बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचे निदर्शनास आणुन देतानाच या योजनेचा फेर आढावा घ्यावा, या संबंधी अनेक शेतकऱ्यांनी, वीज ग्राहक संघटनांनी शासनाला पाठवलेल्या पत्रांची दखल घेवुन अंमलबजावणी करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे