शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Agneepath: "सैन्यात कंत्राटी भरती करणारे देश कंत्राटावर देतील", जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 10:47 IST

Agneepath: जे सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा विचार करीत आहेत, तेच एक दिवस देश कंत्राटी पद्धतीने चालवायला देतील, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

 भिवंडी : जे सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा विचार करीत आहेत, तेच एक दिवस देश कंत्राटी पद्धतीने चालवायला देतील, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भारतीय सैन्य दल सीमेवर अहोरात्र रक्षण करते म्हणून आपण येथे निश्चिंत आहोत. त्यांच्या भावनांची अशी थट्टा करू नका, असे आवाहनही आव्हाड यांनी सरकारला केले.शुक्रवारी रात्री भिवंडीत एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असताना आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, माजी उपमहापौर इम्रान खान, अहमद सिद्दीकी आदी उपस्थित होते.देशातील तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती देणारी अग्निपथ योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खासकरून उत्तर भारतात अनेक युवक रस्त्यावर उतरून या योजनेचा निषेध करीत आहेत. त्यांचा उद्रेक हळूहळू देशभरात पसरत आहे. त्याबद्दल आव्हाड यांना विचारले असता त्यांनी केंद्र सरकारच्या सैन्यभरती योजनेवर टीका केली.

चार वर्षानंतर वाऱ्यावर सोडणार का?सैन्य दलात भरती होण्यासाठी अनेक युवक दोन-तीन वर्षे खडतर मेहनत करतात. अशा युवकांनी चार वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देणार का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. एसटी कामगारांच्या कंत्राटी भरतीस विरोध करणारे शरद पवार यांच्या घरावर हल्ला करीत घुसले, तेच आता या सैन्य दलातील कंत्राटी पद्धतीचे समर्थन करतात, हे हास्यास्पद आहे, असा टोलाही आव्हाड लगावला.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNarendra Modiनरेंद्र मोदी