शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

Agneepath: "सैन्यात कंत्राटी भरती करणारे देश कंत्राटावर देतील", जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 10:47 IST

Agneepath: जे सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा विचार करीत आहेत, तेच एक दिवस देश कंत्राटी पद्धतीने चालवायला देतील, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

 भिवंडी : जे सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा विचार करीत आहेत, तेच एक दिवस देश कंत्राटी पद्धतीने चालवायला देतील, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भारतीय सैन्य दल सीमेवर अहोरात्र रक्षण करते म्हणून आपण येथे निश्चिंत आहोत. त्यांच्या भावनांची अशी थट्टा करू नका, असे आवाहनही आव्हाड यांनी सरकारला केले.शुक्रवारी रात्री भिवंडीत एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असताना आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, माजी उपमहापौर इम्रान खान, अहमद सिद्दीकी आदी उपस्थित होते.देशातील तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती देणारी अग्निपथ योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खासकरून उत्तर भारतात अनेक युवक रस्त्यावर उतरून या योजनेचा निषेध करीत आहेत. त्यांचा उद्रेक हळूहळू देशभरात पसरत आहे. त्याबद्दल आव्हाड यांना विचारले असता त्यांनी केंद्र सरकारच्या सैन्यभरती योजनेवर टीका केली.

चार वर्षानंतर वाऱ्यावर सोडणार का?सैन्य दलात भरती होण्यासाठी अनेक युवक दोन-तीन वर्षे खडतर मेहनत करतात. अशा युवकांनी चार वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देणार का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. एसटी कामगारांच्या कंत्राटी भरतीस विरोध करणारे शरद पवार यांच्या घरावर हल्ला करीत घुसले, तेच आता या सैन्य दलातील कंत्राटी पद्धतीचे समर्थन करतात, हे हास्यास्पद आहे, असा टोलाही आव्हाड लगावला.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNarendra Modiनरेंद्र मोदी