शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

Agneepath: "सैन्यात कंत्राटी भरती करणारे देश कंत्राटावर देतील", जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 10:47 IST

Agneepath: जे सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा विचार करीत आहेत, तेच एक दिवस देश कंत्राटी पद्धतीने चालवायला देतील, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

 भिवंडी : जे सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा विचार करीत आहेत, तेच एक दिवस देश कंत्राटी पद्धतीने चालवायला देतील, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भारतीय सैन्य दल सीमेवर अहोरात्र रक्षण करते म्हणून आपण येथे निश्चिंत आहोत. त्यांच्या भावनांची अशी थट्टा करू नका, असे आवाहनही आव्हाड यांनी सरकारला केले.शुक्रवारी रात्री भिवंडीत एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असताना आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, माजी उपमहापौर इम्रान खान, अहमद सिद्दीकी आदी उपस्थित होते.देशातील तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती देणारी अग्निपथ योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खासकरून उत्तर भारतात अनेक युवक रस्त्यावर उतरून या योजनेचा निषेध करीत आहेत. त्यांचा उद्रेक हळूहळू देशभरात पसरत आहे. त्याबद्दल आव्हाड यांना विचारले असता त्यांनी केंद्र सरकारच्या सैन्यभरती योजनेवर टीका केली.

चार वर्षानंतर वाऱ्यावर सोडणार का?सैन्य दलात भरती होण्यासाठी अनेक युवक दोन-तीन वर्षे खडतर मेहनत करतात. अशा युवकांनी चार वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देणार का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. एसटी कामगारांच्या कंत्राटी भरतीस विरोध करणारे शरद पवार यांच्या घरावर हल्ला करीत घुसले, तेच आता या सैन्य दलातील कंत्राटी पद्धतीचे समर्थन करतात, हे हास्यास्पद आहे, असा टोलाही आव्हाड लगावला.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNarendra Modiनरेंद्र मोदी