शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 02:34 IST

यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी उदय सामंत यांनी कृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पदाधिकाºयांसोबत आॅनलाइन बैठक घेतली

मुंबई : महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी २४ सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याप्रश्नी आॅनलाइन बैठक घेतली. मात्र, चर्चा झालेल्या मागण्या मान्य झाल्याचे लेखी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा शिक्षकेतर कर्मचाºयांनी घेतला.

महाराष्ट्रातील १३ अकृषी विद्यापीठातील कर्मचारी, अधिकाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू करावी, विद्यापीठ, महाविद्यालयातील रिक्त पदे भरावीत, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मुंबई विद्यापीठातही सोमवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले असून, १,२०० शिक्षकेतर कर्मचाºयांनी यात सहभागी झाले. कलिना विद्यापीठात अनेक परीक्षार्थी विद्यार्थी कामासाठी आले असता, त्यांचे कोणतेही काम होऊ शकले नाही. आंदोलनामुळे विद्यापीठांमधील काम ठप्प झाल्याने याचा मोठा फटका परीक्षा विभागातील तयारीला बसला आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी उदय सामंत यांनी कृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पदाधिकाºयांसोबत आॅनलाइन बैठक घेतली. विद्यार्थी हितासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्या जात नाहीत, राज्यातील सर्व संघटना यावर एक निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठ शिक्षक, अधिकारी कार्यकारी समन्वय समितीचे निमंत्रक दीपक घोणे यांनी दिली.सरकार मागण्यांवर सकारात्मकराज्यातील अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली. या कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, यानंतर त्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. विद्यार्थी हित लक्षात घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.- उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण विभाग

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEducation Sectorशिक्षण क्षेत्र