शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

'सामील व्हा नाय तर', अफजलखानही असंच म्हणत होता; डॉ. कोल्हेंचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 12:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात युवासंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादी पक्षातून अनेक जण सध्या पक्षांतर करत आहेत. नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीवर संकट आले आहे. मात्र हे संकट नसून ही तर संधी आहे, युवक मित्रांनो. या संधीच सोनं करा, असं आवाहन कोल्हे यांनी युवकांना केले.

मुंबई - विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत पडझड सुरू झाली. राष्ट्रावादी काँग्रेसमधून आतापर्यंत ३० नेत्यांनी पक्षांतर केले. यापैकी बहुतांश नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करण्यात येत आहे. मावळचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील आपले मतं मांडले. पक्षातील पडझड म्हणजे संकट नसून ही एक संधी असल्याचे कोल्हे यांनी युवक कार्यकर्त्यांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात युवासंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादी पक्षातून अनेक जण सध्या पक्षांतर करत आहेत. नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीवर संकट आले आहे. मात्र हे संकट नसून ही तर संधी आहे, युवक मित्रांनो. या संधीच सोनं करा, असं आवाहन कोल्हे यांनी युवकांना केले.

यावेळी कोल्हे यांनी शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. स्वराज्यावर अफजलखान चाल करून आला होता. तेव्हा सर्वांनाच त्याची भिती वाटत होती. बलाढ्य सेनेसह आलेल्या अफजल खानाने तमाम सरदारांना, मांडलिकांना आमच्यात सामील व्हा, तरच तुम्ही सुरक्षित राहू शकाल असं फर्मान सुनावले. त्यामुळे अनेक सरदार, मंडलिक अफजल खानाला सामीलही झाले. तशीच काहीशी परिस्थिती आताही आहे. इतिहासाची कायम पुनरावृत्ती होत असते. परंतु, महाजारांनी यातून संधी शोधल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांसमोर शरणागती पत्करण्याचा पर्याय होता. परंतु, दख्खनमधून मोठा योद्धा येत आहे, त्याला पराभूत केले तर दख्खनमध्ये सर्वांनाच कळेल, शिवाजी महाराज काय आहेत. ही संधी होती. महाराजांनी आलेल्या संकटात संधी शोधली. आपण महाराजांचे मावळे असून यातून आपल्याला संधी शोधायची, अस डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू होण्याच्या एक दिवसआधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली असून छत्रपती उदयनराजे भोसले या यात्रेत स्टार प्रचारक असणार आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.