शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

'सामील व्हा नाय तर', अफजलखानही असंच म्हणत होता; डॉ. कोल्हेंचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 12:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात युवासंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादी पक्षातून अनेक जण सध्या पक्षांतर करत आहेत. नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीवर संकट आले आहे. मात्र हे संकट नसून ही तर संधी आहे, युवक मित्रांनो. या संधीच सोनं करा, असं आवाहन कोल्हे यांनी युवकांना केले.

मुंबई - विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत पडझड सुरू झाली. राष्ट्रावादी काँग्रेसमधून आतापर्यंत ३० नेत्यांनी पक्षांतर केले. यापैकी बहुतांश नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करण्यात येत आहे. मावळचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील आपले मतं मांडले. पक्षातील पडझड म्हणजे संकट नसून ही एक संधी असल्याचे कोल्हे यांनी युवक कार्यकर्त्यांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात युवासंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादी पक्षातून अनेक जण सध्या पक्षांतर करत आहेत. नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीवर संकट आले आहे. मात्र हे संकट नसून ही तर संधी आहे, युवक मित्रांनो. या संधीच सोनं करा, असं आवाहन कोल्हे यांनी युवकांना केले.

यावेळी कोल्हे यांनी शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. स्वराज्यावर अफजलखान चाल करून आला होता. तेव्हा सर्वांनाच त्याची भिती वाटत होती. बलाढ्य सेनेसह आलेल्या अफजल खानाने तमाम सरदारांना, मांडलिकांना आमच्यात सामील व्हा, तरच तुम्ही सुरक्षित राहू शकाल असं फर्मान सुनावले. त्यामुळे अनेक सरदार, मंडलिक अफजल खानाला सामीलही झाले. तशीच काहीशी परिस्थिती आताही आहे. इतिहासाची कायम पुनरावृत्ती होत असते. परंतु, महाजारांनी यातून संधी शोधल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांसमोर शरणागती पत्करण्याचा पर्याय होता. परंतु, दख्खनमधून मोठा योद्धा येत आहे, त्याला पराभूत केले तर दख्खनमध्ये सर्वांनाच कळेल, शिवाजी महाराज काय आहेत. ही संधी होती. महाराजांनी आलेल्या संकटात संधी शोधली. आपण महाराजांचे मावळे असून यातून आपल्याला संधी शोधायची, अस डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू होण्याच्या एक दिवसआधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली असून छत्रपती उदयनराजे भोसले या यात्रेत स्टार प्रचारक असणार आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.