शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कालच्या वादानंतर दोन्ही राजे फडणवीसांकडे; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले वेगळेच कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:30 IST

संभाजीनगरमधील बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनप्रसंगी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सभापती विक्रम पवार यांनी खासदार उदयनराजेंसह सुमारे ४५ जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

मार्केटयार्ड उभारण्यावरून साताऱ्यात बुधवारी भाजपाचे राज्यसभा खासदार उदयन राजे आणि आमदार  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात वाद झाला होता. दोघांचेही समर्थक समोरसमोर आले होते. दोघांनीही वेगवेगळी भूमिपूजने केली होती. आता या वादानंतर दोन्ही राजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. 

संभाजीनगरमधील बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनप्रसंगी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सभापती विक्रम पवार यांनी खासदार उदयनराजेंसह सुमारे ४५ जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. सातारा शहराजवळील खिंडवाडी येथे मूळ मालक खासदार उदयनराजे भोसले आणि काही कूळांच्या ताब्यात सुमारे १६ एकर जमीन होती. ही जमीन शासनाकडून बाजारसमितीने ताब्यात घेतली आहे. त्याठिकाणी मार्केट, गुरांचा बाजार, क्लोड स्टोअरेज करण्याचे नियोजन आहे. यामुळे शहराच्या बाहेरच लोकांची घाऊक खरेदी विक्री होईल, असे बाजार समितीचे नियोजन आहे. तर याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजीनगर ग्रामपंचायतीला आरोग्य आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने त्याठिकाणी पाण्याची टाकी, आरोग्यकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. यावरुन राजेंच्या दोन्ही गटामध्ये वाद निर्माण झाला होता. 

उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनीही संभाजीनगर ग्रामपंचायतीसाठी पाण्याची टाकी, फिल्टरेशन टँक आणि आरोग्य केंद्राचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे पुढील काळातही हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे फडणवीस यांनी दोन्ही राजेंना बोलवून घेतले असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत होती. आज सकाळीच दोन्ही राजे फडणवीसांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर उदयनराजे बाहेर आले तर शिवेंद्रसिंहराजेंसोबत फडणवीस चर्चा करत होते. विकासकामांसंदर्भात दोन्ही राजांशी चर्चा केल्याची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली आहे. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा