शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

वेदांतानंतर कोकणातील रिफायनरी प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार? प्रकल्प रखडल्याने आरआरपीसीएएलने दिलं अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 09:41 IST

Maharashtra Government:

मुंबई - सुमारे एक लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक लाख रोजगार निर्मिती क्षमता असलेला वेदांता फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील राजकारण पेटले आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्य सरकार आणि भाजपावर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, वेदांतापाठोपाठ महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला कोकणातील रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याचे संकेत मिळल आहे. या प्रकल्पाशी संबंधित कंपनीने सरकारला शेवटचं अल्टिमेटम देण्याची तयारी सुरू केली आहे.

कोकणातील नाणार येथे सुरुवातीला प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे या प्रकल्पाची जागा बदलण्यासाठी चाचपणी सुरू झाली होती. दरम्यान, या प्रकल्पाला सुरुवात होण्यास विलंब होत असल्याने या प्रकल्पाशी संबंधित आरआरपीसीएएल कंपनीने प्रकल्पाबाबत सरकारला शेवटचं अल्टिमेटम देण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत राज्य सरकारला महिनाभरात निर्णय घ्यावा लागणार आहे.

आरआरीपीसीएएलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांपासून प्रकल्प रखडला आहे. विरोध आणि सरकारची भूमिका पाहता कंपनी शेवटचं अल्टिमेटम देण्याची तयारी सुरू आहे. कंपनी राज्यात प्रकल्पाचा मार्ग मोकळा न झाल्यास सदर प्रकल्प राज्याबाहेर नेण्याच्या विचारात आहे. कंपनी राज्य सरकारला तसं शेवटचं अल्टिमेटम देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता वेदांतापाठोपाठ आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnanar refinery projectनाणार प्रकल्पMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार