शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वेदांतानंतर कोकणातील रिफायनरी प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार? प्रकल्प रखडल्याने आरआरपीसीएएलने दिलं अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 09:41 IST

Maharashtra Government:

मुंबई - सुमारे एक लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक लाख रोजगार निर्मिती क्षमता असलेला वेदांता फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील राजकारण पेटले आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्य सरकार आणि भाजपावर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, वेदांतापाठोपाठ महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला कोकणातील रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याचे संकेत मिळल आहे. या प्रकल्पाशी संबंधित कंपनीने सरकारला शेवटचं अल्टिमेटम देण्याची तयारी सुरू केली आहे.

कोकणातील नाणार येथे सुरुवातीला प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे या प्रकल्पाची जागा बदलण्यासाठी चाचपणी सुरू झाली होती. दरम्यान, या प्रकल्पाला सुरुवात होण्यास विलंब होत असल्याने या प्रकल्पाशी संबंधित आरआरपीसीएएल कंपनीने प्रकल्पाबाबत सरकारला शेवटचं अल्टिमेटम देण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत राज्य सरकारला महिनाभरात निर्णय घ्यावा लागणार आहे.

आरआरीपीसीएएलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांपासून प्रकल्प रखडला आहे. विरोध आणि सरकारची भूमिका पाहता कंपनी शेवटचं अल्टिमेटम देण्याची तयारी सुरू आहे. कंपनी राज्यात प्रकल्पाचा मार्ग मोकळा न झाल्यास सदर प्रकल्प राज्याबाहेर नेण्याच्या विचारात आहे. कंपनी राज्य सरकारला तसं शेवटचं अल्टिमेटम देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता वेदांतापाठोपाठ आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnanar refinery projectनाणार प्रकल्पMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार