शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 16:52 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असे प्रश्न उपस्थित झाले.

मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हे खिचडी सरकार असून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ  हे टिकणार नाही, अशी टीका विरोधक पहिल्या दिवसांपासून करत आहेत. त्यासाठी अनेक प्रयत्नही करण्यात येत आहेत. मात्र विद्यमान सरकारमध्ये सुसूत्रता येण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून या अभद्र युतीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. 

दरम्यान महाविकास आघाडीच्या स्थापनेला महिना झाला असून अद्याप सर्वकाही सुरळीत सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सामावून घेत असून भाजपच आपला शत्रू असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची तुलना जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली होती. 

उद्धव यांच्या या टीकेवर पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, ‘याचा अर्थ गाडी बरोबर दिशेने जात आहे. सरकार पूर्ण पाच वर्षे टिकायला आता काही अडचण दिसत नाही. अर्थात शिवसेना पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांना साथ देत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.