शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 16:52 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असे प्रश्न उपस्थित झाले.

मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हे खिचडी सरकार असून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ  हे टिकणार नाही, अशी टीका विरोधक पहिल्या दिवसांपासून करत आहेत. त्यासाठी अनेक प्रयत्नही करण्यात येत आहेत. मात्र विद्यमान सरकारमध्ये सुसूत्रता येण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून या अभद्र युतीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. 

दरम्यान महाविकास आघाडीच्या स्थापनेला महिना झाला असून अद्याप सर्वकाही सुरळीत सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सामावून घेत असून भाजपच आपला शत्रू असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची तुलना जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली होती. 

उद्धव यांच्या या टीकेवर पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, ‘याचा अर्थ गाडी बरोबर दिशेने जात आहे. सरकार पूर्ण पाच वर्षे टिकायला आता काही अडचण दिसत नाही. अर्थात शिवसेना पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांना साथ देत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.