शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 16:52 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असे प्रश्न उपस्थित झाले.

मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हे खिचडी सरकार असून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ  हे टिकणार नाही, अशी टीका विरोधक पहिल्या दिवसांपासून करत आहेत. त्यासाठी अनेक प्रयत्नही करण्यात येत आहेत. मात्र विद्यमान सरकारमध्ये सुसूत्रता येण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून या अभद्र युतीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. 

दरम्यान महाविकास आघाडीच्या स्थापनेला महिना झाला असून अद्याप सर्वकाही सुरळीत सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सामावून घेत असून भाजपच आपला शत्रू असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची तुलना जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली होती. 

उद्धव यांच्या या टीकेवर पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, ‘याचा अर्थ गाडी बरोबर दिशेने जात आहे. सरकार पूर्ण पाच वर्षे टिकायला आता काही अडचण दिसत नाही. अर्थात शिवसेना पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांना साथ देत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.