शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर राज्यात दुष्काळाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 06:28 IST

राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस झाल्याने दुष्काळाचे ढग दाटून आलेले आहेत. मराठवाड्यातील निम्मी पिके करपली आहेत. विदर्भात खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला आहे.

लातूर : राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस झाल्याने दुष्काळाचे ढग दाटून आलेले आहेत. मराठवाड्यातील निम्मी पिके करपली आहेत. विदर्भात खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जलसाठ्याची चांगली स्थिती नाही, तसेच खान्देशात आॅक्टोबरमध्येच पाण्याचे संकट जाणवू लागले आहे. टंचाईच्या या स्थितीची दखल घेत राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.राज्यात, विशेषत: मराठवाड्यात दुष्काळजन्य स्थिती आहे. पंचनामे वेगाने सुरू आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत टंचाईची स्थिती समोर येईल. त्यानंतर, केंद्रीय पथकाची पाहणी पूर्ण करून दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सरकार मागे हटणार नाही, अशी ग्वाही त्यांनी लातूर येथे अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठे काम झाले, परंतु मराठवाड्यात ७० टक्के व त्यापेक्षा कमी पाऊस झाला. या कठीण स्थितीत सरकार जनतेच्या पाठीशी आहे. गत सरकारच्या १५ वर्षांच्या काळात शेतकºयांना ७ हजार कोटींची मदत मिळाली. चार वर्षांत आम्ही २२ हजार कोटींची मदत दिली. या सरकारने चार वर्षांत ८,५०० कोटींचा शेतमाल खरेदी केला.२०१९ नंतरही मीच मुख्यमंत्री...लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी एका महिन्याच्या आत जागा उपलब्ध करून देण्यात येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विस्तारीकरण व सेवासुविधांसाठी तीन टप्प्यांत १०० कोटी रुपये दिले जातील. पहिला टप्पा लगेच, दुसरा टप्पा पुढच्या वर्षात आणि तिसरा टप्पाही माझ्याच कार्यकाळात मिळेल. कारण २०१९ नंतरही मीच मुख्यमंत्री असणार आहे. हे मी आपल्या पाठिंब्यावर जाहीरपणे सांगू इच्छितो, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.काँग्रेस सरकारच्या काळात दुष्काळी स्थितीत तत्काळ मदत दिली होती, पण सध्याचे सरकार अजून दुष्काळ जाहीर करत नाही.- खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्रीसरकारने केवळ सरकारी कागद न रंगविता तातडीने दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क माफ करावे.- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र