शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 09:40 IST

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला असून या निवडणूक निकालानंतर राज्यातील २ पक्ष संपतील असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. 

कराड - Prithviraj  Chavan on BJP ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ राजकीय पक्ष लोप पावेल, या पक्षांचं अस्तित्व दिसणार नाही किंवा यातील लोक इतर पक्षात जातील असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. 

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज राज्यात ६ पक्ष एकमेकांविरोधात उभे आहेत. ३ एकाबाजूला तर ३ दुसऱ्याबाजूला आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर किमान २ पक्ष लोप पावतील. कुठेतरी विलीनीकरण होईल किंवा माणसं इकडे तिकडे पळतील. राज्यात ६ पैकी २ राजकीय पक्ष राहणार नाहीत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच महाविकास आघाडीकडे राज्यात ४८ पैकी जास्तीत जास्त जागा येतील. हे निकाल अनपेक्षित असतील. महाराष्ट्रात मविआला चांगला प्रतिसाद आहे. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल असा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. आता मोदी नको, अशी सुप्त लाट राज्यात आहे. तुम्ही ४०० पार चा नारा दिला आहे. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने मोदी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात नसलेल्या गोष्टी बोलतायेत. १० वर्ष सत्तेत असलेले सरकार त्यांच्या कामगिरीचा आढावा देत नाही. भाजपाच्या जाहिरनाम्याबाबत मोदी बोलत नाही असा निशाणा पृथ्वीराज चव्हाणांनी साधला. 

उदयनराजेंचा पराभव निश्चित, दीड लाखांच्या फरकानं पडणार 

महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार आणि संविधान बचाव या ५ मुद्द्यावरून आमचा प्रचार होता. उदयनराजे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकिटावर आम्ही निवडून दिले होते. पण २०१९ ला त्यांनी पक्ष बदलला. भाजपाची साथ धरली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं मिळून उदयनराजेंचा ९० हजार मतांनी पराभव केला होता. आता आम्ही ३ पक्ष आहोत. त्यामुळे दीड लाखांच्या फरकाने उदयनराजेंचा पराभव नक्कीच होणार आहे.  सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेने तीन वेळा उदयनराजेंना निवडून दिले, त्यानंतर चौथ्यांदा पाडले. जनतेला त्यांच्या खासदारकीची कारकि‍र्द, लोकसभेत मांडलेली भूमिका, भाषणे याकडे लोकांचे लक्ष असते. कराड दक्षिण, पाटण, कराड उत्तर या भागात उदयनराजे कितीदा आले? लोकांच्या सुखदुखात ते गेले का? हा विचार सामान्य माणूस करतो. आम्ही गेलो तर भेट होईल का असा विचार लोकांच्या मनात असतो. त्यामुळेच उदयनराजेंचा ९० हजार मतांनी पराभव झाला. आता उदयनराजेंचा पराभव होईल त्याबाबत शंका नाही. फक्त किती फरकाने असेल हे पाहावे लागेल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला. 

बारामतीत मोदींविरोधात संताप, सुप्रिया सुळे विजयी होतील 

बारामतीत एकतर्फी सुप्रिया सुळेंचा विजय होईल, भोर, पुरंदरच्या काँग्रेस आमदाराची महत्त्वाची भूमिका आहे. या मतदारसंघात संघर्ष आहे. घरातलं भांडण आहे. मात्र शरद पवारांबाबत कृतज्ञता भावना आहे, पवारांनी बारामतीला महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं. शरद पवार नसते तर अजित पवार कुठे असते? हा प्रश्न लोक विचारतात, निवडणुकीत जी भाषा वापरली जातेय, जे काही घडले ते लोकांना आवडले नाही. मोदींनी शरद पवारांबाबत जे उद्गार काढले त्यावर लोकांचा संताप आहे असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४satara-pcसातारा