शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

सूर्यास्तानंतर तसंच दारू प्यायल्यानंतर समुद्रात पोहण्यास गोव्यामध्ये बंदी घालण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 11:51 IST

मद्य प्यायलेल्या अवस्थेत तसेच सूर्यास्तानंतर समुद्रात पोहण्यास बंदी घालण्याचा विचार गोवा सरकार करत आहे. राज्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये पोहताना बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोहण्यास निर्बंध घालण्याचा सरकार विचार करत आहे.

ठळक मुद्देगेल्या पंधरा दिवसांत एकूण सहाजणांचा बुडून मृत्यू झाला आहेविशेष म्हणजे या सगळ्या दुर्दैवी घटना सूर्यास्तानंतर घडल्या होत्यासगळ्या बीचेसवर सूर्योदय ते सूर्यास्त या काळात लाइफगार्ड असतात, रात्री नसतात

पणजी, दि. 9 - मद्य प्यायलेल्या अवस्थेत तसेच सूर्यास्तानंतर समुद्रात पोहण्यास बंदी घालण्याचा विचार गोवा सरकार करत आहे. राज्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये पोहताना बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोहण्यास निर्बंध घालण्याचा सरकार विचार करत आहे.

गोव्याच्या समुद्रात गेल्या पंधरा दिवसांत एकूण सहाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या महिन्यात सुरू होत असतानाच समुद्रात बुडून मृत्यू पावणार्‍या पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने पर्यटन आणि पोलिस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. गुरुवारी अहमदाबादमधले दोन विद्यार्थी कँडोलिम बीचवर बुडाले, त्याआधी एकच दिवस, वेगवेगळ्या बीचवर दोन पर्यटक बुडाले होते.

या घटनांनंतर जलरक्षकांच्या खासगी संस्थेने एक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली होती. विशेष म्हणजे या सगळ्या दुर्दैवी घटना सूर्यास्तानंतर घडल्या होत्या, ज्यावेळी समुद्रावर लाइफ गार्ड नसतात. त्यामुळे सूर्यास्तानंतर व मद्यप्राशन करून समुद्रात पोहण्यास उतरणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्याचा विचार होत आहे. सरकारी प्रवक्त्याने या संदर्भात सांगितले की मद्य प्राशन केल्यानंतर किंवा सूर्यास्तानंतर समुद्रात उतरण्यास बंदी घालणारा कायदा करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. या खेरीज पर्यटकांशी संबंध येणाऱ्या सगळ्या स्थानिकांनी पर्यटकांना काळोख पडल्यानंतर समुद्रात उतरण्यास मज्जाव करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

गोव्यातल्या सगळ्या बीचेसवर सूर्योदय ते सूर्यास्त या काळात लाइफगार्ड असतात, मात्र रात्री ते नसतात आणि याच वेळात पर्यटक बुडण्याची शक्यता जास्त असते.

वर्षाला सुमारे 60 लाख पर्यटक गोव्यात येतात

गोव्याला वार्षिक सरासरी 60 लाख पर्यटक भेट देतात. यात बहुतांश देशी पर्यटकांचा समावेश असतो आणि समुद्रात बुडून मृत्यू होणारेही बहुतांश देशी पर्यटकच आढळून येत आहेत. अहमदाबाद गुजरात येथील एका शैक्षणिक संस्थेच्या दोघा विद्यार्थी मुलींचा गुरुवारी 7 रोजी उत्तर गोव्यातील कांदोळी समुद्रात बुडून मृत्यू झाला.

तीन दिवसांपूर्वी नैनितालमधील पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. कांदोळी व कळंगुटच्या पट्ट्यातील समुद्रात गेल्या आठवडाभरातच चौघा पर्यटकांना जलसमाधी मिळाली. तत्पूर्वी दोनापावल येथील समुद्रात होडी उलटून दोघे मच्छिमार बुडाले.

टॅग्स :Travelप्रवासAccidentअपघात