शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Politics: शिवसेनेच्या पावलावर मनसेचे पाऊल; मनसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्रे घेणार? राज ठाकरेंचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 16:01 IST

शिवसेनेनंतर आता मनसेनेही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र घेण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठीच गळती लागली आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एकमागून एक बैठका, सभा, दौरे यावर भर देत पक्ष वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे शिवसेनेने खासदार, आमदार, नगरसेवकांपासून पंचायत समिती सदस्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाकडूनही तशाच प्रकारचे पत्र घेतले जात आहे. मात्र, अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मनसैनिकांकडून निष्ठेचे प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून देण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. चंद्रपुरात मनसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून दिले आहे. अशा प्रकारचे शपथपत्र भरून देणारा चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार शपथपत्र भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

राज ठाकरे यांनीच दिले शपथपत्रासंदर्भात आदेश!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी ते वरोरा येथे आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी शपथपत्रे भरून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हाच राज यांनी चंद्रपुरातील पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रे भरून देण्याचे आदेश दिले होते, असे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष धास्तावले आहेत. आपल्याही पक्षात फूट पडण्याची भीती या राजकीय पक्षांना वाटत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेतही फूट पडू नये यासाठी राज ठाकरे यांनी कंबर कसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात टीव्ही९ने वृत्त दिले आहे. दरम्यान, मनसेची ही निष्ठेचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची मोहीम फक्त चंद्रपुरापुरतीच मर्यादित असेल की राज्याच्या इतर जिल्ह्यातही ही मोहीम राबवली जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेchandrapur-pcचंद्रपूर