शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेचं 'निर्धार अभियान'; मराठवाड्यापासून शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 13:08 IST

युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत अशी माहिती वरुण सरदेसाईंनी दिली.

सोलापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटना बांधणीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. त्यात आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेने राज्यभर निर्धार अभियान हाती घेतले आहे. तुळजापूर येथील आई भवानीचा आशीर्वाद घेऊन या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. १० सप्टेंबर ते २० सप्टेंबर या काळात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात मराठवाड्यातून अभियानाची सुरुवात होत आहे. 

याबाबत वरुण सरदेसाई म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि बुलढाण्यातील काही भागाचा मिळून ४८ विधानसभा मतदारसंघाचा हा दौरा आहे. या मतदारसंघात जात तेथील युवासैनिक, युवक युवतींसोबत संवाद साधण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा आहे. सगळ्या युवकांना भेटण्याचा हा दौरा आहे. जास्तीत जास्त तरुणांना युवासेनेशी जोडण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत. येत्या १० दिवसांत सोलापूर विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत युवासेना, संभाजी ब्रिगेड मिळून पूर्ण ताकदीने आम्ही लढू. २ दिवसांपूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुका पार पडल्या. त्याठिकाणी युवासेनेचा सदस्य १६०० मतांनी विजयी झाली. हे पहिल्यांदाच घडलंय. त्यामुळे आमची सुरुवात चांगली झाली आहे. त्याचीच पुनरावृत्ती राज्यातील विद्यापीठात करू. प्रत्येक विद्यापीठात युवासेनेचा आवाज पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं वरुण सरदेसाई यांनी सांगितले. 

पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांचे लक्ष केंद्रीत

दरम्यान, युवासेनेच्या माध्यमातून काम करायला अनेक तरुण एकवटत आहेत. त्यांना संघटित करण्यासाठी हे अभियान घेतले आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात चांगले तरुण युवासेनेला जोडत आहोत. ज्यांना कुणाला आव्हान द्यायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कुठेतरी संघटना वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. हे अतिशय दुर्देवी आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत, भास्कर जाधव हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. आम्हीही या अभियानाच्या माध्यमातून युवक, तरुणांसमोर जे काही प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू असा विश्वासही वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईAaditya Thackerayआदित्य ठाकरे