शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेचं 'निर्धार अभियान'; मराठवाड्यापासून शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 13:08 IST

युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत अशी माहिती वरुण सरदेसाईंनी दिली.

सोलापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटना बांधणीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. त्यात आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेने राज्यभर निर्धार अभियान हाती घेतले आहे. तुळजापूर येथील आई भवानीचा आशीर्वाद घेऊन या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. १० सप्टेंबर ते २० सप्टेंबर या काळात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात मराठवाड्यातून अभियानाची सुरुवात होत आहे. 

याबाबत वरुण सरदेसाई म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि बुलढाण्यातील काही भागाचा मिळून ४८ विधानसभा मतदारसंघाचा हा दौरा आहे. या मतदारसंघात जात तेथील युवासैनिक, युवक युवतींसोबत संवाद साधण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा आहे. सगळ्या युवकांना भेटण्याचा हा दौरा आहे. जास्तीत जास्त तरुणांना युवासेनेशी जोडण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत. येत्या १० दिवसांत सोलापूर विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत युवासेना, संभाजी ब्रिगेड मिळून पूर्ण ताकदीने आम्ही लढू. २ दिवसांपूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुका पार पडल्या. त्याठिकाणी युवासेनेचा सदस्य १६०० मतांनी विजयी झाली. हे पहिल्यांदाच घडलंय. त्यामुळे आमची सुरुवात चांगली झाली आहे. त्याचीच पुनरावृत्ती राज्यातील विद्यापीठात करू. प्रत्येक विद्यापीठात युवासेनेचा आवाज पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं वरुण सरदेसाई यांनी सांगितले. 

पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांचे लक्ष केंद्रीत

दरम्यान, युवासेनेच्या माध्यमातून काम करायला अनेक तरुण एकवटत आहेत. त्यांना संघटित करण्यासाठी हे अभियान घेतले आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात चांगले तरुण युवासेनेला जोडत आहोत. ज्यांना कुणाला आव्हान द्यायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कुठेतरी संघटना वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. हे अतिशय दुर्देवी आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत, भास्कर जाधव हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. आम्हीही या अभियानाच्या माध्यमातून युवक, तरुणांसमोर जे काही प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू असा विश्वासही वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईAaditya Thackerayआदित्य ठाकरे