शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेचं 'निर्धार अभियान'; मराठवाड्यापासून शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 13:08 IST

युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत अशी माहिती वरुण सरदेसाईंनी दिली.

सोलापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटना बांधणीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. त्यात आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेने राज्यभर निर्धार अभियान हाती घेतले आहे. तुळजापूर येथील आई भवानीचा आशीर्वाद घेऊन या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. १० सप्टेंबर ते २० सप्टेंबर या काळात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात मराठवाड्यातून अभियानाची सुरुवात होत आहे. 

याबाबत वरुण सरदेसाई म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि बुलढाण्यातील काही भागाचा मिळून ४८ विधानसभा मतदारसंघाचा हा दौरा आहे. या मतदारसंघात जात तेथील युवासैनिक, युवक युवतींसोबत संवाद साधण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा आहे. सगळ्या युवकांना भेटण्याचा हा दौरा आहे. जास्तीत जास्त तरुणांना युवासेनेशी जोडण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत. येत्या १० दिवसांत सोलापूर विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत युवासेना, संभाजी ब्रिगेड मिळून पूर्ण ताकदीने आम्ही लढू. २ दिवसांपूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुका पार पडल्या. त्याठिकाणी युवासेनेचा सदस्य १६०० मतांनी विजयी झाली. हे पहिल्यांदाच घडलंय. त्यामुळे आमची सुरुवात चांगली झाली आहे. त्याचीच पुनरावृत्ती राज्यातील विद्यापीठात करू. प्रत्येक विद्यापीठात युवासेनेचा आवाज पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं वरुण सरदेसाई यांनी सांगितले. 

पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांचे लक्ष केंद्रीत

दरम्यान, युवासेनेच्या माध्यमातून काम करायला अनेक तरुण एकवटत आहेत. त्यांना संघटित करण्यासाठी हे अभियान घेतले आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात चांगले तरुण युवासेनेला जोडत आहोत. ज्यांना कुणाला आव्हान द्यायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कुठेतरी संघटना वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. हे अतिशय दुर्देवी आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत, भास्कर जाधव हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. आम्हीही या अभियानाच्या माध्यमातून युवक, तरुणांसमोर जे काही प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू असा विश्वासही वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईAaditya Thackerayआदित्य ठाकरे