शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेचं 'निर्धार अभियान'; मराठवाड्यापासून शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 13:08 IST

युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत अशी माहिती वरुण सरदेसाईंनी दिली.

सोलापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटना बांधणीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. त्यात आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेने राज्यभर निर्धार अभियान हाती घेतले आहे. तुळजापूर येथील आई भवानीचा आशीर्वाद घेऊन या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. १० सप्टेंबर ते २० सप्टेंबर या काळात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात मराठवाड्यातून अभियानाची सुरुवात होत आहे. 

याबाबत वरुण सरदेसाई म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि बुलढाण्यातील काही भागाचा मिळून ४८ विधानसभा मतदारसंघाचा हा दौरा आहे. या मतदारसंघात जात तेथील युवासैनिक, युवक युवतींसोबत संवाद साधण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा आहे. सगळ्या युवकांना भेटण्याचा हा दौरा आहे. जास्तीत जास्त तरुणांना युवासेनेशी जोडण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत. येत्या १० दिवसांत सोलापूर विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत युवासेना, संभाजी ब्रिगेड मिळून पूर्ण ताकदीने आम्ही लढू. २ दिवसांपूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुका पार पडल्या. त्याठिकाणी युवासेनेचा सदस्य १६०० मतांनी विजयी झाली. हे पहिल्यांदाच घडलंय. त्यामुळे आमची सुरुवात चांगली झाली आहे. त्याचीच पुनरावृत्ती राज्यातील विद्यापीठात करू. प्रत्येक विद्यापीठात युवासेनेचा आवाज पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं वरुण सरदेसाई यांनी सांगितले. 

पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांचे लक्ष केंद्रीत

दरम्यान, युवासेनेच्या माध्यमातून काम करायला अनेक तरुण एकवटत आहेत. त्यांना संघटित करण्यासाठी हे अभियान घेतले आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात चांगले तरुण युवासेनेला जोडत आहोत. ज्यांना कुणाला आव्हान द्यायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कुठेतरी संघटना वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. हे अतिशय दुर्देवी आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत, भास्कर जाधव हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. आम्हीही या अभियानाच्या माध्यमातून युवक, तरुणांसमोर जे काही प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू असा विश्वासही वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईAaditya Thackerayआदित्य ठाकरे