शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

फडणवीसांच्या कर्जमाफीनंतरही विदर्भात साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 10:20 IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जून २०१७ रोजी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती. या योजनेस छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव देण्यात आले.

मुंबई: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर आणण्यासाठी आधीच्या याच भाजपच्या सरकारने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देऊनही अटी, शर्तीच्या गुंत्यांत बहुतांश शेतकरी वंचित राहिले. त्यामुळे भाजपच्या कर्जमाफीनंतरही एकट्या विदर्भात साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जून २०१७ रोजी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती. या योजनेस छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव देण्यात आले. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची अट सरकारने घातली होती. त्यामुळे महा ई-सेवा केंद्राबाहेर अनेक दिवस रांगेत उभे राहून शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले. हे अर्ज भरताना महा ई-सेवा केंद्र चालकांनी काही त्रुटी ठेवल्या. तर तांत्रिक चुका आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे पात्र शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळाली नसल्याचे समोर आले होते.

तर दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, डोक्यावरील सावकारांचे कर्ज, मुला-मुलींच्या शिक्षण आणि विवाहात त्यामुळे येणारे अडथळे अशा असंख्य विवंचनांमुळे पश्चिम विदर्भ व वर्धासह सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. आतापर्यंतच्या ११ महिन्यांत १,०५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर भाजपच्या कर्जमाफीनंतरही विदर्भाच्या सहा जिल्ह्यांतील साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

तर आपले सरकार आल्यावर कर्जमाफी करु असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी ठणकावून सांगत होते. त्यामुळे शिवसेना सत्तेत येताच शेतक-यांना दिलासा मिळणार अशी अपेक्षा राज्यातील शेतक-यांना होती. मात्र सत्ता येऊन अजूनही उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.