शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर...", श्रीकांत शिंदे आरक्षणाच्या निर्णयावर काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 11:01 IST

राज्य सरकारने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदेंनी शिंदे समिती नेमल्यामुळे हैदराबाद गॅझेट पुढे आले, असे ते म्हणाले. 

Manoj Jarange Maratha Reservation: "एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम शिंदे समिती स्थापन केली. या समितीच्या अभ्यासातून हैदराबाद गॅझेट पुढे आले, ज्यात मराठा समाजातील अनेक कुटुंबांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती. हाच आधार घेऊन पुढील काळात मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग खुला करण्याची दिशा ठरली", असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाचे श्रेय अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात सुरू केलेले उपोषण २ सप्टेंबर रोजी संपवले. त्यानंतर एक पोस्ट लिहून खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर भाष्य केले. 

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, "मराठा समाजाच्या आरक्षणबाबत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनेक महत्वाच्या मागण्या आज महायुती सरकारने मान्य केल्या असून यामुळे हा दिवस मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे." 

शिंदेंनी आरक्षणासंदर्भात ठोस पावले टाकली

"गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलने सुरू होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले आणि त्याबाबत ठोस पावले उचलली", असे श्रीकांत शिंदे म्हणाले. 

"त्या अभ्यासामुळे हैदराबाद गॅझेटचा ऐतिहासिक निर्णय झाला"

"त्यांनी (एकनाथ शिंदे) सर्वप्रथम शिंदे समिती स्थापन केली. या समितीच्या अभ्यासातून हैदराबाद गॅझेट पुढे आले, ज्यात मराठा समाजातील अनेक कुटुंबांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती. हाच आधार घेऊन पुढील काळात मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग खुला करण्याची दिशा ठरली. आज या अभ्यासाच्या आधारे हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जारी करण्यात आला", असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. 

"ग्रामपातळीवर नोंदी तपासून मराठा समाजातील पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे", अशा भावना खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या. 

देवेंद्र फडणवीसांनी निर्णायक भूमिका बजावली

श्रीकांत शिंदे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करून त्या आज मान्य केल्या आहेत. आंदोलन शांततेत मार्गी लावण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली आणि शासन निर्णय प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी ठोस पावले उचलली."

"हा केवळ मराठा समाजाचा विजय नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आज मराठा समाजाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचे खूप खूप अभिनंदन", असे श्रीकांत शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस