शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

नमस्कार साहेब, मी तुम्हाला मतदान केलेला मतदार (राजा?) बोलतोय...

By प्रविण मरगळे | Updated: July 6, 2023 13:41 IST

राजकीय नेते म्हणून तुम्ही चुकला नाहीत, तर मतदार म्हणून आमची चूक झालेली आहे, अशी उद्विग्नता आज आमच्या मनात आहे.

हॅलो, नमस्कार मी एक मतदार बोलतोय, तुम्ही ओळखलं नसेलच. कारण आपल्याला भेटून पाच वर्षं होत आली. मतांसाठी तुम्ही आमचे उंबरठे दर पाच वर्षांनी झिजवता, पण याच मतदाराला आज तुमच्या लेखी काहीच किंमत उरली नाही. पक्षीय विचारधारा, धोरणे, आमच्या भागाचा विकास या गोष्टींचा  विचार करून आम्ही तुम्हाला मतदान करत असतो. परंतु, सध्याचं राजकारण बघता आम्ही मतदान करावं की नाही, हाच प्रश्न आमच्या मनाला पडलाय.

सत्तेच्या लोभापायी, खुर्ची टिकवण्यासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही इकडून तिकडं उड्या मारता. कधी सत्तेत तर कधी विरोधात, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष तुम्ही एकमेकांसोबत सलोख्याने राहता. परंतु, तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता नेत्याच्या सांगण्यावरून स्वतःची माथी भडकवत एकमेकांची डोकी फोडतो. खरंतर आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो आमच्या देशात लोकशाही आहे. इथं जनताच मालक आहे. मालक नव्हे तर आम्हाला मतदारराजा म्हटलं जातं. परंतु निवडणुकीनंतर याच राजाला तुम्ही महाभारतातील धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसवता. समोर कितीही बेबंदशाही माजली असली तरी मतदार म्हणून आम्ही हतबलच असतो.

महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशी लढाई होती. आम्ही मतदार म्हणून मतदानाचे कर्तव्य बजावलं. निकालात शिवसेना-भाजपाला बहुमत मिळालं. परंतु, त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेला खेळखंडोबा पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. आधी ८० तासांचे 'भाजपा-राष्ट्रवादी' सरकार, नंतर 'शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी' सरकार पाहिलं. अडीच वर्षांचा हा काळ लोटल्यानंतर पुन्हा शिवसेना शिंदे-भाजप आणि आता 'राष्ट्रवादी अजित पवार - एकनाथ शिंदे शिवसेना - भाजपा' असं सरकार पाहायला मिळत आहे. गेल्या चार वर्षात महाराष्ट्राच्याराजकारणाचा चिखल झालाय, हे बघून प्रचंड त्रास होतो. राजकीय नेते म्हणून तुम्ही चुकला नाहीत, तर मतदार म्हणून आमची चूक झालेली आहे, अशी उद्विग्नता आज आमच्या मनात आहे.

'राजकारण' या शब्दाचाच मतदार म्हणून आम्हाला कीव यायला लागलाय. केवळ म्हणण्यासाठी 'राजा' असलेला हा मतदार तुमच्या दृष्टीने केवळ एक 'प्यादं' बनून राहिलाय. खरं तर, आज तुम्हाला फोन करताना मनात नेमकी कुठली भावना आहे सांगू शकत नाही. राग, हतबलता, लाज, वैताग, चीड असं सगळंच दाटून आलंय. म्हटलं तुम्हाला आमचा विसर पडला आहे का हे बघून घ्यावं. तुमचं काय हो, तुमच्या सात पिढ्या बसून खातील इतकं कमावलं आहे. आम्ही मतदार काय रोज सकाळी उठायचं, जेवणाचा डबा घ्यायचा खचाखच भरलेल्या ट्रेनमधून कामाला जायचं. अहो, हल्ली आमच्या रेल्वेच्या डब्यातही तुमचाच विषय असतो. आज हा इकडे गेला, उद्या त्यांनी तिकडे उडी मारू नये म्हणजे झालं. राजकारणात काही होऊ शकत म्हणा. आम्ही मतदार काहीच करू शकत नाही. 

साहेब, होय तुम्ही सेवक असलात तरी तुम्हाला 'साहेबच' म्हणावं लागेल. कारण तुम्ही राजकीय नेते आहात. आपणास एक विनंती करतो की, मतदार म्हणून आमचाही जरा विचार करा. तुम्ही चूक आहात की बरोबर, निर्दोष आहात की दोषी हे जनतेच्या न्यायालयात येऊन विचारा. ही धमकी नाही. 'बिच्चारा मतदार' काय धमकी देणार हो. पण तुमच्यात धमक आहे, असं तुम्ही सगळीकडे सांगत असता, ती आम्हालाही बघायची आहे. येताय ना?... आम्ही वाट बघतोय!

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदानAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे