शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पवार कुटुंब का फुटलं?; रोहित पवारांच्या वडिलांनी पहिल्यांदाच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 13:13 IST

अजित पवार आणि शरद पवार यांची राजकीय भूमिका वेगळी झाल्यानंतर आता पवार कुटुंबातील मतभेदही समोर येऊ लागले आहेत.

बारामती - Rajendra Pawar Statement ( Marathi News ) राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेमुळे पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले. आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई होईल असं बोललं जात आहे. त्यातच आता आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवारांनी मला रोखलं नसतं तर त्यावेळीच फूट पडली असती असा गौप्यस्फोट केला आहे. 

राजेंद्र पवार म्हणाले की, काही वेळा लोकांच्या भावना असतात. त्या निनावी पत्राच्या रुपाने बाहेर येतात. बारामतीच्या लोकांच्या भावना अशाप्रकारे बाहेर आल्या असतील. छत्रपती कारखान्याची निवडणूक लागली तेव्हा अप्पासाहेबांनी अजित पवारांना संधी दिली. त्यावेळी मी शेती बघत होतो. पण शरद पवारांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीत आले तेव्हा अजित पवार राजकारणात सक्रीय झाले. त्यावेळी मी दोनदा छत्रपती कारखानाच्या निवडणुकीत रस दाखवला. तेव्हा शरद पवारांनी मला दोन्ही वेळा आपण या क्षेत्रात जाऊ नये असं सांगितले असं त्यांनी म्हटलं. 

तसेच हा शरद पवारांचा आदेश होता. त्यावेळी तो मी मानला. शरद पवारांना राजकारण जास्त कळतं. त्यामुळे कदाचित मी राजकीय क्षेत्रात आलो असतो तर आज जे काही दिसते त्याची सुरुवात त्याचवेळी झाली असती. पण जे झाले चांगले झालेले आहे. त्यामुळे मला शेतीकडे, सामाजिक कार्याकडे लक्ष देता आले. त्याचसोबत व्यवसायाचं बस्तान मला बसवता आले. त्याचा उपयोग रोहित पवारांना झाला असंही राजेंद्र पवार म्हणाले. 

दरम्यान, पवार हे नाव दिल्लीपर्यंत शरद पवारांनी नेले. जे काही निर्णय शरद पवार स्वत: घ्यायचे. अजितदादांनी वेगळा विचार मांडला. भाजपासोबत गेले. त्यामुळे कदाचित लोकांना पवार कुटुंबात वाद झाला असं वाटत असेल. सुनेत्रा वहिनी कदाचित लोकसभेला उभं राहणार असतील त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम झाल्याचं दिसून येते. मला लोकांच्या राहायला आवडते, वडिलांपासून मला ती आवड होती. त्यामुळे मलाही सामाजिक कार्याची आवड होती. ती आजही करत राहिलो असंही राजेंद्र पवारांनी सांगितले. 

वाद नको म्हणून रोहित पवार नगर जिल्ह्यात गेले

लोकांना वेगवेगळे विषय हवे असते. पवार कुटुंबात काय चाललंय त्यात डोकावण्याचा रस असतो. वस्तूस्थिती काय असते हे अनेकांना माहिती नसते. अद्याप कुणी समोर आले नाही. पवारविरुद्ध पवार निवडणूक होईल अशी शक्यता आहे. ही वेळ यायला नको होती. गेल्या ५० वर्षापासून अनेक कुटुंब शरद पवारांसोबत आहेत. अशावेळी त्या कुटुंबावर दडपण यायला नको. आजपर्यंत हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता. मागच्या ५ वर्षापूर्वी आमदारकीला उभे राहण्याची वेळ आली तेव्हा रोहित पवारांनी नगर जिल्ह्यात जाऊन मतदारसंघात निवडणूक लढवली. कुटुंबात वाद नको म्हणून ही भूमिका घेतली असंही राजेंद्र पवार यांनी सांगितले

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार