शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

२०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 11:39 IST

बहुमताला महत्त्व आहेच परंतु केवळ बहुमतावर हा निवडणूक आयोगाचा निर्णय झाला नाही असं फडणवीसांनी सांगितले.

नागपूर - Devendra Fadnavis on NCP ( Marathi News ) निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित होता. आज जे लोकशाहीच्या नावाने ओरडतायेत त्यांनीच लोकशाहीचा मुडदा पाडला होता अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात देवेंद्र फडणवीसांनी या निकालावरून विरोधकांवर शरसंधान साधले. फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, यापूर्वी समाजवादी पक्षाचा वाद झाला होता. तेव्हा आणि इतर ५ प्रकरणात घेतलेली भूमिका तीच आहे. त्यामुळे जो काही निर्णय आहे तो अपेक्षित आहे. बहुमताने जो निर्णय घेतला जातो तो लोकशाहीत महत्त्वाचा असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पक्षाचे जे संविधान आहे त्याचे किती पालन केले गेले या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या गोष्टींचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आला आहे असं सांगत फडणवीसांनी अजित पवारांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. 

त्याचसोबत बहुमताला महत्त्व आहेच परंतु केवळ बहुमतावर हा निवडणूक आयोगाचा निर्णय झाला नाही. तर वेळोवेळी जे पक्षाचे संविधान होते त्याचे किती पालन केले गेले. निवडणुका झाल्या की नाही. आता नेमकी पार्टी कोणाची याचा विचार निकालात झाला आहे. २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला त्यांना लोकशाही काय असते हे समजलं असेल. आज जे लोकशाहीबद्दल ओरडतायेत त्यांनी खरे लोकशाहीचा मुडदा पाडला होता त्या लोकशाहीनेच त्यांना जागा दाखवली. २०१९ मध्ये जनतेचा कौला नाकारला गेला होता. मतदारांच्या निर्णयाला डावलून काम केले होते अशी टीकाही फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केली. 

"पवार साहेब जिथे उभे राहतील तिथे तो पक्ष उभा राहील" 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. हा सरासर अन्याय आहे, शरद पवारांवर अन्याय झाला आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यात शंका नाही. शरद पवारांनी महाराष्ट्रासह देशभरात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे. २८ राज्यात हा पक्ष असून त्यातील २३ राज्यांनी पाठिंबा दिला आहे. जे पदाधिकारी शरद पवारांच्या पाठिशी आहेत हे दाखवूनही दुर्दैवी निकाल दिला. आम्ही याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागू असं जयंत पाटलांनी म्हटलं.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSharad Pawarशरद पवार