शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

२०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 11:39 IST

बहुमताला महत्त्व आहेच परंतु केवळ बहुमतावर हा निवडणूक आयोगाचा निर्णय झाला नाही असं फडणवीसांनी सांगितले.

नागपूर - Devendra Fadnavis on NCP ( Marathi News ) निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित होता. आज जे लोकशाहीच्या नावाने ओरडतायेत त्यांनीच लोकशाहीचा मुडदा पाडला होता अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात देवेंद्र फडणवीसांनी या निकालावरून विरोधकांवर शरसंधान साधले. फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, यापूर्वी समाजवादी पक्षाचा वाद झाला होता. तेव्हा आणि इतर ५ प्रकरणात घेतलेली भूमिका तीच आहे. त्यामुळे जो काही निर्णय आहे तो अपेक्षित आहे. बहुमताने जो निर्णय घेतला जातो तो लोकशाहीत महत्त्वाचा असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पक्षाचे जे संविधान आहे त्याचे किती पालन केले गेले या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या गोष्टींचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आला आहे असं सांगत फडणवीसांनी अजित पवारांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. 

त्याचसोबत बहुमताला महत्त्व आहेच परंतु केवळ बहुमतावर हा निवडणूक आयोगाचा निर्णय झाला नाही. तर वेळोवेळी जे पक्षाचे संविधान होते त्याचे किती पालन केले गेले. निवडणुका झाल्या की नाही. आता नेमकी पार्टी कोणाची याचा विचार निकालात झाला आहे. २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला त्यांना लोकशाही काय असते हे समजलं असेल. आज जे लोकशाहीबद्दल ओरडतायेत त्यांनी खरे लोकशाहीचा मुडदा पाडला होता त्या लोकशाहीनेच त्यांना जागा दाखवली. २०१९ मध्ये जनतेचा कौला नाकारला गेला होता. मतदारांच्या निर्णयाला डावलून काम केले होते अशी टीकाही फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केली. 

"पवार साहेब जिथे उभे राहतील तिथे तो पक्ष उभा राहील" 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. हा सरासर अन्याय आहे, शरद पवारांवर अन्याय झाला आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यात शंका नाही. शरद पवारांनी महाराष्ट्रासह देशभरात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे. २८ राज्यात हा पक्ष असून त्यातील २३ राज्यांनी पाठिंबा दिला आहे. जे पदाधिकारी शरद पवारांच्या पाठिशी आहेत हे दाखवूनही दुर्दैवी निकाल दिला. आम्ही याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागू असं जयंत पाटलांनी म्हटलं.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSharad Pawarशरद पवार