शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

२०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 11:39 IST

बहुमताला महत्त्व आहेच परंतु केवळ बहुमतावर हा निवडणूक आयोगाचा निर्णय झाला नाही असं फडणवीसांनी सांगितले.

नागपूर - Devendra Fadnavis on NCP ( Marathi News ) निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित होता. आज जे लोकशाहीच्या नावाने ओरडतायेत त्यांनीच लोकशाहीचा मुडदा पाडला होता अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात देवेंद्र फडणवीसांनी या निकालावरून विरोधकांवर शरसंधान साधले. फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, यापूर्वी समाजवादी पक्षाचा वाद झाला होता. तेव्हा आणि इतर ५ प्रकरणात घेतलेली भूमिका तीच आहे. त्यामुळे जो काही निर्णय आहे तो अपेक्षित आहे. बहुमताने जो निर्णय घेतला जातो तो लोकशाहीत महत्त्वाचा असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पक्षाचे जे संविधान आहे त्याचे किती पालन केले गेले या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या गोष्टींचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आला आहे असं सांगत फडणवीसांनी अजित पवारांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. 

त्याचसोबत बहुमताला महत्त्व आहेच परंतु केवळ बहुमतावर हा निवडणूक आयोगाचा निर्णय झाला नाही. तर वेळोवेळी जे पक्षाचे संविधान होते त्याचे किती पालन केले गेले. निवडणुका झाल्या की नाही. आता नेमकी पार्टी कोणाची याचा विचार निकालात झाला आहे. २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला त्यांना लोकशाही काय असते हे समजलं असेल. आज जे लोकशाहीबद्दल ओरडतायेत त्यांनी खरे लोकशाहीचा मुडदा पाडला होता त्या लोकशाहीनेच त्यांना जागा दाखवली. २०१९ मध्ये जनतेचा कौला नाकारला गेला होता. मतदारांच्या निर्णयाला डावलून काम केले होते अशी टीकाही फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केली. 

"पवार साहेब जिथे उभे राहतील तिथे तो पक्ष उभा राहील" 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. हा सरासर अन्याय आहे, शरद पवारांवर अन्याय झाला आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यात शंका नाही. शरद पवारांनी महाराष्ट्रासह देशभरात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे. २८ राज्यात हा पक्ष असून त्यातील २३ राज्यांनी पाठिंबा दिला आहे. जे पदाधिकारी शरद पवारांच्या पाठिशी आहेत हे दाखवूनही दुर्दैवी निकाल दिला. आम्ही याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागू असं जयंत पाटलांनी म्हटलं.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSharad Pawarशरद पवार