शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रत्नागिरी: तब्बल 45 वर्षांनंतर भाऊच्या धक्क्याकडे पहिली प्रवासी बोट रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 16:57 IST

दापोली तालुक्यातील दाभोळ धक्यावरून तब्बल ४५ वर्षांनंतर पहिली प्रवासी बोट आज मुंबईकडे रवाना झाली. ऐतिहासिक दाभोळ धक्का ते भाऊचा धक्का असा या बोटीचा प्रवास सुरू झाला आहे.

शिवाजी गोरे

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील दाभोळ धक्यावरून तब्बल ४५ वर्षांनंतर पहिली प्रवासी बोट आज मुंबईकडे रवाना झाली. ऐतिहासिक दाभोळ धक्का ते भाऊचा धक्का असा या बोटीचा प्रवास सुरू झाला आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी मेरिटाइम बोर्डाने ही बोट सुरू केली आहे , त्यामुळे या ऐतिहासिक बंदराला गतवैभव प्राप्त होणार आहे . दाभोळ  बंदराला प्राचीन काळापासून फार महत्व आहे. आदिलशाही काळात दक्षिणेकडील राजे महाराजे दाभोळ बंदरातून हजला जात होते. हजला जाताना वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने दाभोळ येथे अंडा मजिद बांधण्यात आली होती. या बंदरात पोर्तुगीज, डच, छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाह, ब्रिटिश यांनी आरमार उभे केले होते.प्राचीन काळी दाभोळ बंदरात मोठी गलबते येत असत. मुंबई भाऊचा धक्का ते दाभोळ धक्का अशी प्रवासीबोट सेवा १९७२ पर्यंत सुरू होती. मात्र कालांतराने ही सेवा बंद पडली. आता ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे या धक्क्याला गतवैभव प्राप्त होतील, असे अपेक्षित आहे. या जलवाहतुकीने पर्यटनाला चालना मिळणार आहे.कोकणातील महामार्गावरील वाहतूक कोंडी पर्यटकांची डोकेदुखी बनली असून, महामार्ग अनेक ठिकाणी मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर दरवर्षी शेकडो निष्पाप लोकांचे प्राण जात आहेत. हा ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक सुरू करण्याचा पर्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला होता. त्याला आता मूर्त स्वरुप येत आहे.रावे नावाची बोट ३५ प्रवासी घेऊन मध्यरात्री १ वाजता दाभोळ येथे आली. आज ही बोट ३५ प्रवासी घेऊन मुंबईकडे रवाना झाली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबई