शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

२८ तासांनंतर तारापूरचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू

By admin | Updated: May 21, 2016 04:02 IST

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुमारे ४० जणांनी अहोरात्र करून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पूर्ण केले. तर, पाणीपुरवठा २८ तासांनंतर दुपारी दीड वाजता सुरळीत झाला.

बोईसर : तारापूर एमआयडीसीसह परिसरातील २० ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाऱ्या ३६ इंच व्यासाच्या लोखंडी पत्र्याच्या जलवाहिनीवर गुरुवारी सकाळी कंटेनरवरील अवजड कॉइल वाघोळ खिंडीत कोसळून फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुमारे ४० जणांनी अहोरात्र करून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पूर्ण केले. तर, पाणीपुरवठा २८ तासांनंतर दुपारी दीड वाजता सुरळीत झाला. कंटेनरवरून सुमारे २० टनांची पत्र्याची कॉइल २० फूट खाली पाइपलाइनवर कोसळल्याने पाइप दोन ते तीन ठिकाणी फुटला होता. या दुरुस्ती कामाकरिता तीन क्रेन, एक जनरेटर सेट, चार वेल्डिंग मशीन, १२ वेल्डर्स, काही फिटर्स तसेच एमआयडीसीचे अभियंते व अधिकारी आणि मदतनीस अशा सुमारे ४० जणांच्या टीमने गुरुवारी साडेअकरा वाजता सुरू केले, ते आज सकाळी साडेनऊ वाजता संपले. अवजड कॉइलमुळे फाटलेला पाइप पूर्ण कापून काढून त्या जागी आठ एमएम जाडीचा व १२ मीटर लांब आणि १००० एमएम व्यासाचा पाइप नव्याने टाकण्यात आला. उन्हाचा पारा वाढल्याने वेल्डर्सना चक्कर आली होती. मात्र, एमआयडीसीमधील काही कारखान्यांतून वेल्डर्स मागवून काम पूर्ण करण्यात आले. वाघोबा खिंडीच्या उतार भागात हे काम सुरू असताना अहोरात्र भरधाव धावणाऱ्या वाहनांपासूनही काम करणाऱ्यांना धोका उद्भवत होता. य ासर्वांवर मात करून ठप्प झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यास एमआयडीसीचे अभियंता नंदकुमार करवा आणि आर.पी. पाटील व त्यांच्या टीमला यश आले. (वार्ताहर)युद्धपातळीवर काम केल्याने दोन ते अडीच दिवसांचे काम २५ तासांत पूर्ण केले असून या अपघातामुळे एमआयडीसीचे सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई एमआयडीसी सदर ट्रान्सपोर्टवाल्यांकडून वसूल करणार आहे.- नंदकुमार करावा, उपअभियंता, एमआयडीसी तारापूर.