शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

“मनोज जरांगेंना नैराश्य, मराठा बांधवांनी नादाला लागू नये”; गुणरत्न सदावर्तेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 17:25 IST

Gunaratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मराठा समाजाने आरक्षणाची लढाई सोडली पाहिजे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

Gunaratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले. विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.  

मराठा समाजाने आरक्षणाची लढाई सोडली पाहिजे. लोकशाहीमध्ये तुम्हाला एखादी मागणी करण्याचा अधिकार आहे. पण, दिलेच पाहिजे, असे म्हणण्याचा अधिकार नाही. मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांच्या नादाला लागू नये. मनोज जरांगे यांनी स्वतःचा राजकीय प्रचार करून घ्यावा. काही जण म्हणतात की, मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी. पक्ष काढावा. ते प्रमोशन त्यांनी करावे, असे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मनोज जरांगे यांना नैराश्य आले आहे

मनोज जरांगे यांना नैराश्य आले आहे. आम्हीही आंदोलने केली आहेत. आंदोलन करण्याबाबत कुणाचे दुमत नाही. परंतु, त्या आंदोलनाची फलश्रुती काय, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. मराठा बांधवांनी मनोज जरांगेंच्या नादाला लागण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.  यापूर्वीही मनोज जरांगे यांनी बेकायदेशीरपणे वर्तन करुन मुंबईत येऊन धुडगूस घालू, असे म्हटले होते. ते मुंबईला वेठीस धरु पाहत होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात बोलणारा मीच होतो. कायद्याचे उल्लंघन करुन अशाप्रकारे वेशीत घुसता येत नाही, हे मी दाखवून दिले आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे नैराश्यात आहेत. अंतरवाली सराटीमध्ये जखमी झालेल्या लोकांची जबाबदारी त्यांची आहे. अंतरवालीत जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाने मंगळवारी विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले होते. त्याविरोधात गुणरत्न सदावर्ते उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला तर आम्ही त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण