शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“मनोज जरांगेंना नैराश्य, मराठा बांधवांनी नादाला लागू नये”; गुणरत्न सदावर्तेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 17:25 IST

Gunaratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मराठा समाजाने आरक्षणाची लढाई सोडली पाहिजे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

Gunaratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले. विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.  

मराठा समाजाने आरक्षणाची लढाई सोडली पाहिजे. लोकशाहीमध्ये तुम्हाला एखादी मागणी करण्याचा अधिकार आहे. पण, दिलेच पाहिजे, असे म्हणण्याचा अधिकार नाही. मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांच्या नादाला लागू नये. मनोज जरांगे यांनी स्वतःचा राजकीय प्रचार करून घ्यावा. काही जण म्हणतात की, मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी. पक्ष काढावा. ते प्रमोशन त्यांनी करावे, असे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मनोज जरांगे यांना नैराश्य आले आहे

मनोज जरांगे यांना नैराश्य आले आहे. आम्हीही आंदोलने केली आहेत. आंदोलन करण्याबाबत कुणाचे दुमत नाही. परंतु, त्या आंदोलनाची फलश्रुती काय, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. मराठा बांधवांनी मनोज जरांगेंच्या नादाला लागण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.  यापूर्वीही मनोज जरांगे यांनी बेकायदेशीरपणे वर्तन करुन मुंबईत येऊन धुडगूस घालू, असे म्हटले होते. ते मुंबईला वेठीस धरु पाहत होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात बोलणारा मीच होतो. कायद्याचे उल्लंघन करुन अशाप्रकारे वेशीत घुसता येत नाही, हे मी दाखवून दिले आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे नैराश्यात आहेत. अंतरवाली सराटीमध्ये जखमी झालेल्या लोकांची जबाबदारी त्यांची आहे. अंतरवालीत जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाने मंगळवारी विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले होते. त्याविरोधात गुणरत्न सदावर्ते उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला तर आम्ही त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण