शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

“आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये म्हणून राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 16:39 IST

सुप्रीम कोर्टाने रिझनेबल टाईम किती दिवस? किती वेळ? असे सांगितले नाही. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

Rahul Narvekar Vs Asim Sarode: आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली. यानंतर शिंदे गटाच्या सदस्यांनी उत्तर देण्यासाठी मुदतवाढ दिली होती. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणीला सुरुवात करणार आहेत. मात्र, आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये, यासाठी राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणी १४१ पानांचा निकाल दिला होता. त्यात परिच्छेद ११० आणि १११ मध्ये रिझनेबल टाईममध्ये याप्रकरणाचा निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. पण, रिझनेबल टाईम किती दिवस? किती वेळ? असं सांगितले नाही. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. ही संवैधानिक अनैतिकता आहे. मणिपूरमधील के. मेघचंद्र विरुद्ध विधानसभा अध्यक्ष आणि राजेंद्र सिंह राणा प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, सामान्य परिस्थिती असेल, तर ३ महिन्यांत निकाल दिला पाहिजे. गुंतागुंतीची परिस्थिती असेल, तर ३ महिने आणि सामान्य परिस्थिती असेल, तर ३ महिन्यांमध्ये निकाल लागला पाहिजे, असे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी म्हटले आहे. 

योजना तयार केल्या जात आहेत

 १६ आमदारांच्या संदर्भात कोणतीही गुंतागुंतीची परिस्थिती नाही. आमदार अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये, म्हणून योजना तयार केल्या जात आहेत. राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप असीम सरोदे यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर कार्यवाही करण्याचे काम राहुल नार्वेकरांना करायचे होते. पण, कोणतेही काम राहुल नार्वेकरांनी केलेले नाही. नार्वेकरांनी वेळकाढूपणासाठी शिवसेनेची मूळ घटना अभ्यास करायची आहे, असे सांगून निवडणूक आयोगाकडे त्याची मागणी केली. घटनेचा अभ्यास करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा काही संबंधच नाही, असा दावा असीम सरोदे यांनी केला. 

दरम्यान, भरत गोगावले यांची प्रतोदपदी आणि एकनाथ शिंदे यांची राहुल नार्वेकरांनी गटनेतेपदी केलेली निवड बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितले. सुनील प्रभू शिवसेनेचे प्रतोद आहेत. त्यांनी काढलेल्या व्हीपवर राहुल नार्वेकरांनी काय कार्यवाही केली, अशी विचारणा करत व्हीपच्या विरुद्ध कार्यवाही करणारे सर्वजण अपात्र आहेत. याचा अर्थ १६ आमदार अपात्र आहेत. त्यानंतर बाकीचे गेलेले आमदारही पक्षविरोधी कारवाई केल्याने अपात्र ठरतात, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरvidhan sabhaविधानसभा