शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Aditya Thackeray: प्रश्न विचारत भेटीचे आव्हान देणाऱ्या सुहास कांदेंना आदित्य ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले, गद्दारांना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 13:49 IST

Aditya Thackeray: गद्दारांमध्ये प्रश्न विचारायची हिंमत नसते आणि त्यांची प्रश्न विचारण्याची लायकीही नसते. प्रश्न विचारण्याआधी आधी तुम्ही गद्दारी का केलीत? त्याचं उत्तर द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना दिलं आहे. 

मनमाड (नाशिक) - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील आमदार आणि खासदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केल्याने सध्या शिवसेनेत मोठी फूट पडलेली दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी या बंडखोरांना आव्हान देत त्यांच्या मतदारसंघांमधून शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. दरम्यान, आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मनमाडचा दौरा केला. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याआधी मनमाडचे आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची भेट घेणारच, असं आव्हान दिलं होतं. त्याला आता आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.मनमानमध्ये शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी आता स्वत: काही उत्तरं देत बसणार नाही आहे. कारण गद्दार नसते तर उत्तरं दिली असती. मात्र गद्दारांमध्ये प्रश्न विचारायची हिंमत नसते आणि त्यांची प्रश्न विचारण्याची लायकीही नसते. प्रश्न विचारण्याआधी आधी तुम्ही गद्दारी का केलीत? त्याचं उत्तर द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना दिलं आहे. 

तसेच एकनाथ शिंदे हे पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी गद्दारी का केली हे कळलेच नाही. मात्र गद्दारांचं हे सरकार फार दिवस टिकणार नाही, हे सरकार लवकरच कोसळेल, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. 

महाविकास आघाडी सरकारनं खूप चांगलं काम केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा देशातील पाच उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश होता. कोरोनाकाळातील त्यांच्या कामाचं जगभरातून कौतुक झालं होतं, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाNashikनाशिक