शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Aditya Thackeray: प्रश्न विचारत भेटीचे आव्हान देणाऱ्या सुहास कांदेंना आदित्य ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले, गद्दारांना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 13:49 IST

Aditya Thackeray: गद्दारांमध्ये प्रश्न विचारायची हिंमत नसते आणि त्यांची प्रश्न विचारण्याची लायकीही नसते. प्रश्न विचारण्याआधी आधी तुम्ही गद्दारी का केलीत? त्याचं उत्तर द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना दिलं आहे. 

मनमाड (नाशिक) - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील आमदार आणि खासदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केल्याने सध्या शिवसेनेत मोठी फूट पडलेली दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी या बंडखोरांना आव्हान देत त्यांच्या मतदारसंघांमधून शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. दरम्यान, आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मनमाडचा दौरा केला. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याआधी मनमाडचे आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची भेट घेणारच, असं आव्हान दिलं होतं. त्याला आता आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.मनमानमध्ये शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी आता स्वत: काही उत्तरं देत बसणार नाही आहे. कारण गद्दार नसते तर उत्तरं दिली असती. मात्र गद्दारांमध्ये प्रश्न विचारायची हिंमत नसते आणि त्यांची प्रश्न विचारण्याची लायकीही नसते. प्रश्न विचारण्याआधी आधी तुम्ही गद्दारी का केलीत? त्याचं उत्तर द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना दिलं आहे. 

तसेच एकनाथ शिंदे हे पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी गद्दारी का केली हे कळलेच नाही. मात्र गद्दारांचं हे सरकार फार दिवस टिकणार नाही, हे सरकार लवकरच कोसळेल, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. 

महाविकास आघाडी सरकारनं खूप चांगलं काम केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा देशातील पाच उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश होता. कोरोनाकाळातील त्यांच्या कामाचं जगभरातून कौतुक झालं होतं, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाNashikनाशिक