शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

निर्लज्जपणाचा कळस गाठलाय; बाप चोर, पक्ष चोर आणि आता...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:06 IST

खोके सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल. विरोधी पक्ष म्हणून आपले शेवटचे अधिवेशन असेल असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

रत्नागिरी - बाप चोर, पक्ष चोर, आता हिंदुहृदयसम्राट पदवी चोरली. किती निर्लज्जपणा? त्याचा कळस गाठलाय, किती मास्क लावून फिरणार? किती दिखावा करणार,यापेक्षा एखादी चांगली एक्टिंग करा.जी तुम्ही करताय. हे सगळे काहीही केले तरी गद्दारीचा शिक्का माथ्यावर लागलाय तो पुसला जाणार नाही. ३१ डिसेंबरनंतर हे सरकार जाणार म्हणजे जाणार अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या सगळीकडे आपले सरकार येणार असं वातावरण बनलेले आहे. महाविकास आघाडी म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून येणारी २०२४ ची निवडणूक आपली आहे. लोकसभेत आणि विधानसभेत हे घडवून दाखवायचे आहे. केवळ लोकसभा, विधानसभेत बहुमत आणायचं नाहीतर राज्यसभा, विधान परिषदेतील प्रत्येक जागा आपल्याला निवडून आणायची आहे. आपल्याला प्रत्येक मत गरजेचे आहे. प्रत्येक मत इतिहास घडवू शकतो. आमदार बनल्यावर सभागृहात महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण बोलता येते. गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात जे काही घडलेले आहे.ते खोडून पुन्हा सुवर्ण अक्षरात पुन्हा घडवायचा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच अनेक निवडणुका होणे गरजेचे आहे. ३१ डिसेंबरला सरकार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र करावेच लागेल. खोके सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल. विरोधी पक्ष म्हणून आपले शेवटचे अधिवेशन असेल. २०२४ ला केंद्रात आणि राज्यात परिवर्तन घडवणार म्हणजे घडवणारच ही शपथ आपण घेऊन बाहेर पडलो आहे. गेल्या ५-६ वेळा आपण मुंबई पदवीधर निवडणूक जिंकत आलो आहोत. सगळे सुशिक्षित पदवीधर शिवसेनेसोबत असतो. मुंबई आणि कोकण हे महत्त्वाचे नाते आहे. मागच्यावेळी आपण कोकण पदवीधर निवडणूक लढवायचे ठरवले. पण थोडक्यात पराभूत झालो. शिवसेनेची ताकद प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात दिसते. कोकण पदवीधर निवडणूक ही १०० टक्के शिवसेनेची आहे. त्यात शिवसेनेचा उमेदवार निवडून येणारच आहे असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. 

शंभुराज देसाईंचे प्रत्युत्तरमी पोस्टर पाहिले नाही. त्या पोस्टरचा अर्थ असा आहे की वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय आणि हिंदुत्ववादी विचारांचे वारसदार हे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे कधीही स्वत:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेत नाहीत, कधीच घेणार नाहीत.तेवढे मोठे आम्ही कुणी नाही. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. त्यांच्यापेक्षा कुणी मोठे नाही असं प्रत्युत्तर मंत्री शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे