शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

खातेवाटप जाहीर झाल्यावर आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर बोचरा वार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 22:18 IST

Aditya Thackeray : शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हायला जवळपास सव्वा महिना लागला होता. त्यानंतर जवळपास चार पाच दिवसांनंतर आज नव्य मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. या खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

मुंबई - राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जून महिन्याच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. मात्र उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हायला जवळपास सव्वा महिना लागला होता. त्यानंतर जवळपास चार पाच दिवसांनंतर आज नव्य मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. या खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, जेव्हा कारभारापेक्षा सरकारवरच लक्ष्य केंद्रित केलं जातं तेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ४१ दिवस लागतात. त्यातही अजून एका विस्ताराचं आश्वासन दिलं जातं. त्यानंतर खातेवाटपाला ५ दिवस लागतात. त्यामध्येही सत्तासंतुलनाचा असमतोल दिसून येतो. तसेच यामध्ये महिलांना आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला प्रतिनिधित्व न मिळणे हे निराशाजनक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले. या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती ठेवण्यात आली आहेत.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार