औद्योगिक विकासासाठी यवतमाळ हवाई मार्गाने जोडा

By Admin | Updated: December 30, 2014 00:52 IST2014-12-30T00:52:44+5:302014-12-30T00:52:44+5:30

दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी

Add Yavatmal by air for industrial development | औद्योगिक विकासासाठी यवतमाळ हवाई मार्गाने जोडा

औद्योगिक विकासासाठी यवतमाळ हवाई मार्गाने जोडा

केळकर समितीची शिफारस : दळणवळणाच्या सोई-सुविधांचा अडसर, ब्रॉडगेज रेल्वे लाईनचाही प्रस्ताव
राजेश निस्ताने - यवतमाळ
दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नियमित हवाई वाहतूक सुरू करण्याची शिफारसही या समितीने केली आहे.
शासनाने महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील अभ्यासासाठी डॉ.विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीमध्ये नऊ सदस्य आहेत. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.बी. बक्षी समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीने आपला अहवाल नुकताच शासनाला सादर केला. हा अहवाल विधिमंडळाच्या पटलावरही ठेवला गेला. या अहवालात यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणाची कारणे आणि उपाययोजना यावर ऊहापोह केला गेला आहे. दळणवळणाच्या सोईसुविधांचा अभाव हे प्रमुख कारण डॉ. केळकर समितीने यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणासाठी नमूद केले आहे. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग आणि हवाई मार्ग विकसित करण्यावर भर देण्याचे त्यांनी सुचविले आहे.
यवतमाळात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा विमानतळ आहे. तेथील धावपट्टीचा आणखी विस्तार करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणासाठी त्याचा वापर करावा,
आमदारांनी सरकारवर दबाव वाढवावा
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा विकासात माघारला आहे. जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी दळणवळणाच्या पुरेशा सोई आवश्यक आहे. त्यांच्या कमतरतेवर डॉ. विजय केळकर समितीने शिक्कामोर्तब करताना उपाययोजनाही सूचविल्या आहेत. केळकर समितीचा हा अहवाल जिल्ह्यातील आमदार-खासदारांना विकासासाठीच्या लढाईत ‘अस्त्र’ म्हणून उपयोगी पडणारा आहे. विकासाच्या मुद्यावर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन एकत्र येणे व त्यातूनच केंद्र व राज्यातील सरकारवर दबाव निर्माण करणे अपेक्षित आहे. केळकर समितीच्या शिफारशींचा पाठपुरावा करण्यासोबतच लोकप्रतिनिधींनी आता वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. त्याचे काम वेगाने व्हावे म्हणून आमदारांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची अपेक्षा जिल्हाभरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Add Yavatmal by air for industrial development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.