शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Politics: “जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद जुना, आता...”; केतकी चितळेचा अमृता फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 14:22 IST

Maharashtra Politics: अमृता फडणवीस यांच्या विधानासंदर्भात केतकी चितळेने सोशल मीडियावरून भाष्य केले आहे.

Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधाने, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, नागपूरमधील कथित भूखंड घोटाळा आणि या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी यांसह अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अभिनेत्री केतकी चितळेनेही यावर भाष्य केले आहे. 

अमृता फडणवीस नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान, अभिरूप न्यायालयात सहभागी झाल्या होत्या. तिथे नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला. माझा आरोप असा आहे की, जर नरेंद्र मोदी हे राष्ट्रपिता असतील तर महात्मा गांधी कोण आहेत? असा प्रश्न मुलाखतकारांनी विचारला. त्याला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. असे माझे ठाम मत आहे. आपले दोन राष्ट्रपिता आहेत, नरेंद्र मोदी हे आताच्या नवीन भारताचे तर महात्मा गांधी हे तेव्हाच्या काळातील राष्ट्रपिता आहेत, असे विधान अमृता फडणवीस यांनी केले. यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर केतळी चितळेने प्रतिक्रिया दिली आहे. 

जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद जुना, आता...

केतकी चितळेने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अमृता फडणवीसांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. जुने विरुद्ध नवे गुरु आणि जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना होत चालला आहे. भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलतोय आणि आता आपण स्वत:लाही बदलायची वेळी आली आहे. त्यामुळे आता ३ हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या १०० वर्षे झाली आहेत, हे सत्यही आपण स्वीकारायला हवे, असा टोला तिने अमृता फडणवीसांना लगावला आहे.  जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय  जागो मेरे देश, असेही केतकीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, केतकी चितळेची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. तसेच तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असल्याचेही पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी केतकीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तुरुंगातही जावे लागले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसKetaki Chitaleकेतकी चितळे