शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

'पवारांवरील कारवाई सूडबुद्धीने नसून उशिराच', तक्रारदार जाधव म्हणतात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 10:51 IST

शरद पवार यांच्याविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर याप्रकरणातील तक्रारदार माणिकराव जाधव यांनी एका

मुंबई - राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे प्रकरण तेवढ्यावर थांबणारे नाही. केंद्रीय दक्षता आयोगानेही (सीव्हीसी) शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि शिखर बँकेतील तत्कालीन संचालकांविरोधात चौकशी करण्याचे आदेश नाबार्डला दिल्याची माहिती आहे. मात्र, शरद पवारांवरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत नसल्याचं तक्रारदार माणिकराव जाधव यांनी म्हटलं आहे. 

शरद पवार यांच्याविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर याप्रकरणातील तक्रारदार माणिकराव जाधव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, ही कारवाई कुठल्याही सूडबुद्धीने नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, राजकीय किंवा निवडणुकांचाही या कारवाईशी संबंध नसल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले.  शरद पवार हे राज्याचे नेते असून ते केंद्रात कृषीमंत्री होते, त्या खात्याअंतर्गत नाबार्ड ही संस्था चालते. राज्य सहकारी साखर कारखाना संघ चालतो. जो राज्यातील 200 सहकारी साखरखान्यांचं प्रतिनिधीत्व करतो. राज्य बँकेत गेल्या 25 वर्षात शरद पवारांच्या शब्दाशिवाय कधी पान हाललं नाही. कन्नड साखर कारखाना माझ्या पुतण्यानं विकत घेतला नाही, असं पवार सांगू शकतील का? असा सवाल माणिकराव जाधव यांनी उपस्थित केला आहे. 

महाराष्ट्रातील ज्या कारखान्यांना राज्य बँकेनं कर्ज दिलं. ज्याही साखर कारखान्यांची विक्री झाली, जयंत पाटलांनी मराठवाड्यातील गंगापूर सहकारी साखर कारखाना विकत घेतला. कन्नड सहकारी साखर कारखाना अजित पवार आणि राजेंद्र पवार यांनी विकत घेतला, हे शरद पवारांना माहीत नाही का?. परभणीचा नृसिंह सहकारी साखर कारखाना फौजिया खान यांनी विकत घेतला, हे पवारांना माहीत नाही का?. ग्रामीण भागाचा कायापालट करणारे, शेतकऱ्यांच्या मालकीचे असलेले साखर कारखाने या नेत्यांनी कवडीमोल भावाने विकत घेतले हेही पवारांना माहित नाही का, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.

तसेच, शेतकऱ्यांचे 1700 कोटी रुपयाचे शेअर कॅपिटल, राज्य सरकारचे 2500 कोटी रुपयांचे भाग भांडवल आणि शेतकऱ्यांची 10 हजार एकर जमीन, एवढी मोठी मालमत्ता, 25000 कोटींची मालमत्ता केवळ 600 कोटी रुपयांत विकत घेतली, विशेष म्हणजे मुद्दल कर्जही यातून मिळालं नाही, असा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे. राज्य बँकेच्या मंत्र्यांनी, संचालकांनी, राष्ट्रवादीच्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी हे कारखाने विकत घेतले आहेत. राज्य बँकेतील घोटाळा हा गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेला घोटाळा आहे. आघाडीच्या काळातीलच हा घोटाळा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य बँक बरखास्त केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 88 आणि 83 अंतर्गत याप्रकरणाची चौकशीही लावली. 88 चौकशीत सर्व संचालक दोषी असल्याचा पुरावा शिवाजीराव पैनकर या अधिकाऱ्याने पुढे आणला आहे. सध्याच्या सरकारनेही या घोटाळ्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार होतेय ही कारवाई. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या सूडबुद्धीचा, निवडणुकीच्या राजकारणाचा यामध्ये कसलाही संबंध येत नाही, असे तक्रारदार माणिकराव जाधव यांनी सांगतिले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकCrime Newsगुन्हेगारी