शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

विद्यार्थ्यांना भोजन, निवासाची सोय; प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:27 IST

या निर्णयामुळे गावखेड्यातून जिल्हास्थळी शिक्षणासाठी येणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना निवास, भोजनासह इतर शैक्षणिक सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

मुंबई :  राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन अशी ७२ सरकारी वसतिगृहे अशासकीय संस्थांऐवजी सरकार स्वत: चालविणार असल्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्थळी वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध न झाल्यास भाड्याने इमारती घेण्याची तयारीही दर्शविली आहे. या निर्णयामुळे गावखेड्यातून जिल्हास्थळी शिक्षणासाठी येणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना निवास, भोजनासह इतर शैक्षणिक सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

वसतिगृहाच्या निर्णयाला उशीर का?शैक्षणिक वर्ष २०१९ मध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी निकषाप्रमाणे जमीन उपलब्ध झाल्यानंतर केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निधीची तरतूद करून काम सुरू केले जाणार होते. मंजुरी मिळाल्यापासून दोन वर्षांत या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण करण्याची अट होती. मात्र, चार जिल्ह्यांत सरकारी जमीन उपलब्ध झाली. ३२ जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्ध झाली नाही. जागाच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून अशासकीय संस्थांना वसतिगृहांची जबाबदारी देण्याचा प्रयत्न झाला.

वसतिगृहातील सोयीनिवास, भोजन, स्टेशनरी व इतर शैक्षणिक सुविधा

कोणाला लाभ?इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहांचा लाभ घेता येईल.

प्रवेशासाठी काय कराल?वसतिगृह सुरू झाल्यानंतर विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही आणि कागदपत्रांची यादीसंदर्भात सूचना विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रादेशिक यंत्रणेकडे संपर्क करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थी