शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

"हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा", आदित्य ठाकरेंचं थेट राज्य सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:42 IST

Aaditya Thackeray : हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य कराव्या, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. 

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. मुंबईसह अनेक भागात झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडले आहेत. त्याठिकाणी ठेकेदारांची नेमणूक करून सरकारने तो प्रश्न मार्गी लावावा. तसेच, अनेक ठिकाणी बहुमजली झोपडपट्ट्या आहेत, त्यांना देखील पात्रता यादीत सहभागी करून घ्यावे. हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य कराव्या, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. 

शुक्रवारी आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. तसेच, या खोके सरकारचे देखील शेवटचे अधिवेशन आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मुंबईसह अनेक भागात झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडले आहेत. त्या ठिकाणी ठेकेदारांची नेमणूक करून सरकारने तो प्रश्न मार्गी लावावा. अनेक ठिकाणी बहुमजली झोपडपट्ट्या आहेत. अनेक ठिकाणी G+1, G+2 अशा झोपडपट्ट्या पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील पात्रता यादीत सहभागी करून घ्यावे. हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

या सरकारने गाजर अर्थसंकल्प मांडला असून या अर्थसंकल्पात मुंबईला काहीही मिळाले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी तब्बल सहा हजार कोटींचा घोटाळा आम्ही जनतेसमोर आणला होता. तरी देखील सत्ताधारी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत बोलवून १८ जानेवारीला विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले, मात्र त्यापैकी एकही रस्ता सुरू झाला नाही. त्यासंदर्भात अनिल परब यांनीही हक्कभंग आणला होता, असे आदित्य ठाकरे यांनी सांगत राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला.

याचबरोबर, महायुती सरकार कोस्टल रोड देखील पूर्णपणे सुरू करू शकले नाही. जे काम सुरू आहे त्यांचे खोटे भूमिपूजन करायला पंतप्रधानांना  मुंबईत आणले जात आहे. हे सत्ताधारी पक्ष मोदी यांचे नाव बदनाम करत आहेत, त्यामुळे तुम्ही याकडे जरा लक्ष द्या आणि योग्य ती कारवाई करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज विधान भवनाला वंदन केलं आहे. विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जाता जाता पायरीला स्पर्श करत विधान भवनाला वंदन केले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे