शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा", आदित्य ठाकरेंचं थेट राज्य सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:42 IST

Aaditya Thackeray : हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य कराव्या, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. 

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. मुंबईसह अनेक भागात झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडले आहेत. त्याठिकाणी ठेकेदारांची नेमणूक करून सरकारने तो प्रश्न मार्गी लावावा. तसेच, अनेक ठिकाणी बहुमजली झोपडपट्ट्या आहेत, त्यांना देखील पात्रता यादीत सहभागी करून घ्यावे. हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य कराव्या, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. 

शुक्रवारी आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. तसेच, या खोके सरकारचे देखील शेवटचे अधिवेशन आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मुंबईसह अनेक भागात झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडले आहेत. त्या ठिकाणी ठेकेदारांची नेमणूक करून सरकारने तो प्रश्न मार्गी लावावा. अनेक ठिकाणी बहुमजली झोपडपट्ट्या आहेत. अनेक ठिकाणी G+1, G+2 अशा झोपडपट्ट्या पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील पात्रता यादीत सहभागी करून घ्यावे. हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

या सरकारने गाजर अर्थसंकल्प मांडला असून या अर्थसंकल्पात मुंबईला काहीही मिळाले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी तब्बल सहा हजार कोटींचा घोटाळा आम्ही जनतेसमोर आणला होता. तरी देखील सत्ताधारी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत बोलवून १८ जानेवारीला विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले, मात्र त्यापैकी एकही रस्ता सुरू झाला नाही. त्यासंदर्भात अनिल परब यांनीही हक्कभंग आणला होता, असे आदित्य ठाकरे यांनी सांगत राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला.

याचबरोबर, महायुती सरकार कोस्टल रोड देखील पूर्णपणे सुरू करू शकले नाही. जे काम सुरू आहे त्यांचे खोटे भूमिपूजन करायला पंतप्रधानांना  मुंबईत आणले जात आहे. हे सत्ताधारी पक्ष मोदी यांचे नाव बदनाम करत आहेत, त्यामुळे तुम्ही याकडे जरा लक्ष द्या आणि योग्य ती कारवाई करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज विधान भवनाला वंदन केलं आहे. विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जाता जाता पायरीला स्पर्श करत विधान भवनाला वंदन केले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे