शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

देशात कलह माजविण्यासाठी सत्तेचा गैरवापर; परिवर्तन हवे : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 06:49 IST

तुतारी चिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड/अलिबाग : देशामध्ये गंभीर स्थिती आहे, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. सत्ता ही सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी वापरण्याऐवजी राज्याराज्यात, भाषांमध्ये या सर्वांत कलह माजवण्यासाठी होत आहे. यामुळे देशात आता परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दांत खा. शरद पवार यांनी सत्तेतील भाजपवर निशाणा साधला.

 राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला निवडणूक आयोगाने नुकतेच तुतारी हे नवे चिन्ह दिले आहे. त्याचे अनावरण किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ केले. त्यावेळी पवार बोलत होते.  

ही तर एका संघर्षाची सुरुवात : पवार ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. जनतेसमोर आनंदाच्या तुतारीचे रणशिंग फुंकण्याची स्थिती तुमच्या कष्टाने, प्रयत्नाने येईल याची खात्री आहे, असा विश्वासही शरद पवार यांनी बोलून दाखविला.शरद पवार ४० वर्षांनी किल्ले रायगडावर आले. त्यावरून विरोधकांनी टीकाही केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस