शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भारतीय दंड संहितेचे कलम ३५३ रद्द करण्यात करा, यशोमती ठाकूर यांची विधिमंडळात मागणी

By गणेश वासनिक | Published: July 26, 2023 6:36 PM

लोकहिताच्या दृष्टीने भारतीय दंड संहितेचे ३५३ कलम रद्द करण्यात यावे ,अशी मागणी आमदार ठाकूर यांनी सभागृहात बोलतांना केली.

अमरावती : जनतेने निवडून दिलेल्या आमदार जेव्हा जनहिताच्या कामासाठी शासकीय कार्यालयात जातात, त्याचा जाब विचारतात तेव्हा लोकप्रतिनिधींवर शासकीय कामकामाजात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन भांदवी ३५३ च्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होतो. मात्र जनतेचीच कामे जाणिवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्या तसेच लोकप्रतिनिधींना सहकार्य न करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर अशी कार्यवाही करण्याची कोणतीच तरतुद नाही. याचा अर्थ शासकीय अधिकाऱ्यांना यातून मुभा का देण्यात आली? असा प्रश्न आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी बुधवारी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित करुन हे कलम त्वरीत रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आपला मुद्दा मांडतांना केली.

जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनी सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित कामे निकाली काढण्याकरिता किंवा विविध विकासकामे का रखडली आहेत याचा शासकीय कार्यालयात जावून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणे हा गुन्हा आहे का? असा सवाल करुन त्या म्हणाल्या की, अशा प्रकारचे अनेक गुन्हे लोकप्रतिनिधींवर अनेक ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ५ वर्षाची शिक्षा करण्याची तरतुद सुद्धा करण्यात आली आहे. मात्र नागरिकांची कामे अडवून ठेवणारे किंवा विकासकामाबाबत वेळकाढू धोरण अवलंबणाऱ्या अधिकाऱ्यावर याच धर्तीवर कार्यवाही होत नाही, ही बाब निश्चितपणे अनाकलनीय आहे. 

तर याचा अर्थ शासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींपेक्षा वेगळ्या कॅटगरीत टाकण्यात आले आहे का? आणि हे कितपत योग्य आहे, असाही प्रश्न उपस्थित करुन या कलमातील तरतुदींचा फेरविचार करण्यासाठी यापुर्वी विधीमंडळ सदस्यांची कमिटी सुद्धा गठित करण्यात आली आहे. मात्र याबाबत आजवर कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही. लोकप्रतिनिधीवर अशाप्रकारे गुन्हा दाखल होणे म्हणजे त्यांची एकप्रकारे गळचेपीच ठरत नाही का? या सर्व बाबींचा विचार करुन लोकहिताच्या दृष्टीने भारतीय दंड संहितेचे ३५३ कलम रद्द करण्यात यावे ,अशी मागणी आमदार ठाकूर यांनी सभागृहात बोलतांना केली.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरvidhan sabhaविधानसभा