शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पक्षाने उमेदवारी दिली तर लढणारच : अभय पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 15:00 IST

दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग तालुक्यात आज ही आहे. त्यामुळे अभव पाटील यांना भावनिक फायदा होऊ शकतो.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदार संघातून विद्यमान आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच आता त्यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर यांनी सुद्धा पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हात ही आता काका- पुतण्याचे राजकीय युद्ध पहायला मिळत आहे.

यावर बोलताना अभय पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मी निवडणूक लढवावी अशी मागणी मतदार संघातील लोकांची आहे. त्यामुळे मी पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने जर मला निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यास मी निवडणूक लढवेलच असे अभय पाटील म्हणाले. तसेच पक्षाने थांबण्याचे सांगितले तर पक्षाचा निर्णय मान्य करून माघार घेईल असेही अभय पाटील म्हणाले. तर आमदार भाऊसाहेब पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की आमच्या काका-पुतण्यात यावरून कोणतेही वाद नाहीत.

हेही वाचा काका-पुतण्याचे राजकीय युद्धाचे लोण आता औरंगाबादेत

दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग तालुक्यात आज ही आहे. त्यामुळे अभव पाटील यांना भावनिक फायदा होऊ शकतो. तर भाऊसाहेब पाटील यांनी सुद्धा तालुक्यात आपला वचक निर्माण केले आहे. त्यामुळे आता काका- पुतण्याच्या राजकीय शर्यतीत कुणाच्या पदरात आमदारकीची उमेदवारी पडणार हे पाहणे उचित ठरेल.