शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Abdul Sattar Supriya Sule, Chitra Wagh: "ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण..."; सत्तार-सुप्रिया सुळे वादावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 17:17 IST

संजय राऊतांनी कंगना रानौतसाठी वापरलेल्या शब्दांचीही करून दिली आठवण

Abdul Sattar Supriya Sule: महाराष्ट्राचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या तोंडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना एक अपशब्द उच्चारला गेला. ५० खोकेंबद्दल होणाऱ्या टीकेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना जाहीर मुलाखतीत त्यांनी अपशब्दाचा वापर केला. सत्तार यांच्या या शब्दामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी देखील तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या दरम्यान भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची बाजू मांडली.

चित्रा वाघ म्हणाल्या...

"महिलांचा अवमान करणं किंवा महिलांबद्दल अपशब्द उच्चारणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे केवळ अब्दुल सत्तारच नव्हे तर कोणत्याही नेतेमंडळींनी असे शब्द वापरू नयेत असे माझे मत आहे. पण ही सारी घटना झाली त्याचं कारण ५० खोकेंवरून केली जाणारी टीका. '५० खोके सत्तारांकडे आहेत, त्यातले त्यांनी मला द्यावेत' असं बोलून राज्यभरात या आमदारांच्या विरोधात राळ उठवली जात आहे. त्यां आमदारांना अपमानित करण्याचं काम सुरू आहे. या साऱ्याचा राग म्हणून आलेले ते प्रत्युत्तर आहे. महाविकास आघाडीचे नेते महिलांचा अपमान करत होते. संजय राऊतांनी कंगना रानौतबद्दल हरामXX म्हणण्याइतकी मजल मारली होती. हे सारे आमच्या लक्षात आहे. पण तरीही शिंदे-फडणवीसांच्या सरकारमधील मंत्री, नेते किंवा पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये," असे स्पष्ट शब्दांत चित्रा वाघ म्हणाल्या.

अब्दुल सत्तारांकडून वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण

सुप्रिया सुळेंबद्दल वापरण्यात आलेल्या शब्दांनंतर राष्ट्रवादीसह राज्यभरातून सत्तारांवर टीका झाली. या विरोधानंतर सत्तारांनी माफी मागितली आणि स्पष्टीकरण दिले. माध्यमांशी संवाद साधताना अब्दुल सत्तार म्हणाले, "मी कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. आमची तशी संस्कृती नाही. माझ्या वाक्यामध्ये सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द नाहीत. मी आमच्यावर टीका करणाऱ्यांना तो शब्द वापरला आहे. तरीदेखील कोणत्या महिलेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी सॉरी म्हणतो."

राष्ट्रवादीकडून तीव्र विरोध

अब्दुल सत्तारांनी 24 तासांत माफी मागावी, असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असं राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटले होते. तसेच, 'दहा पक्ष बदलणारे सत्तार हे सत्तार आहेत की सुतार आहेत. सत्तेची मस्ती आलीय, ही मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवेल. सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात आला होता.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSupriya Suleसुप्रिया सुळेAbdul Sattarअब्दुल सत्तारChitra Waghचित्रा वाघKangana Ranautकंगना राणौत