शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मोठी बातमी! आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही; 'मविआ'ला ताकद देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:27 IST

आम आदमी पार्टीने २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात २८८ पैकी २४ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांचा पक्ष आम आदमी पार्टी उमेदवार उतरणार नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे. इंडिया आघाडी मजबूत करणे, पक्षसंघटना बळकट करणे यावर आप पक्षाकडून भर दिला जात आहे. पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे परंतु पक्षाच्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत मिळत आहेत.

सूत्रांनुसार, आम आदमी पक्षाचं लक्ष दिल्लीवर आहे, महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात आणखी संभ्रम निर्माण करायचा नाही ज्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊ शकते असं आप नेत्यांना वाटते. ११ ऑक्टोबर रोजी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी दिल्ली निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यालयात बूथ तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे राज्य ते बुथ स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. संदीप पाठक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सध्या आप पक्षानं दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. 

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी लढवणार नाही. एक किंवा दोन विधानसभेच्या जागांसाठी वाटाघाटी करणं व्यर्थ असल्याचं पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. आपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीला संघटना विस्तारासाठी निवडणूक लढवायची आहे परंतु वरिष्ठ नेतृत्व त्यात फारसं उत्सुक नाही. इंडिया आघाडीची ताकद वाढवावी असं वरिष्ठांचे मत आहे. मतदारांच्या मनात संभ्रम नको म्हणून महाराष्ट्राच्या निवडणूक मैदानातून आप माघार घेत असल्याचं समोर आले आहे.

दरम्यान, आम आदमी पार्टीने २०१९ ची महाराष्ट्र आणि झारखंड दोन्ही विधानसभा निवडणूक लढवल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्रात २८८ पैकी २४ विधानसभा मतदारसंघात आपने उमेदवार उभे केले. त्यातील २३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. झारखंडमध्ये पक्षाने ८१ पैकी २६ जागांवर निवडणूक लढवली त्यातील सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होतील.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा