शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 13:26 IST

'एनडीएमध्ये कुणाचाही आवाज ऐकला जात नाही, आमचा लढा त्याच विचारसरणीविरोधात आहे.'

Maharashtra Politics: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत. भविष्यात काय होईल, याचा अंदाज कुणी बांधू शकत नाही. दरम्यान, माजी मंत्री आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एनडीए आणि इंडिया आघाडीवरही भाष्य केले. 

आदित्य ठाकरे गुरुवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी आदित्य यांनी अनेक प्रश्नांची स्पष्टपणे उत्तरे दिली. त्यांना विचारण्यात आले की, एनडीए आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, इंडिया आघाडीची स्थापना फक्त पंतप्रधान मोदींचा विरोध करण्यासाठी झाली आहे. यावर उत्तर देताना आदित्य म्हणाले, हे साफ चुकीचे आहे. इंडिया आघाडीतील पक्षांची विचारसरणी वेगळी आहे. तरीदेखील सर्वांनी एकत्र येऊन आघाडी केली.

ते पुढे म्हणतात, इंडिया आघाडीत सर्वांचा आवाज ऐकला जातो. एकच व्यक्ती सर्व निर्णय घेत नाही. एनडीएमध्ये सर्व निर्णय एकच व्यक्ती घेते. तिथे कुणाचाही आवाज ऐकून घेतला जात नाही. इंडिया आघाडीचा लढा याच विचारसरणीच्या विरोधात आहे. यावेळी आदित्य यांना विचारण्यात आले की, ते 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक? या प्रश्नाच्या उत्तरात आदित्य म्हणाले की, या संदर्भात सर्व निर्णय पक्ष घेईल. पुढील निवडणुकीत महाराष्ट्रात आमचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाBJPभाजपा