शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 13:26 IST

'एनडीएमध्ये कुणाचाही आवाज ऐकला जात नाही, आमचा लढा त्याच विचारसरणीविरोधात आहे.'

Maharashtra Politics: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत. भविष्यात काय होईल, याचा अंदाज कुणी बांधू शकत नाही. दरम्यान, माजी मंत्री आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एनडीए आणि इंडिया आघाडीवरही भाष्य केले. 

आदित्य ठाकरे गुरुवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी आदित्य यांनी अनेक प्रश्नांची स्पष्टपणे उत्तरे दिली. त्यांना विचारण्यात आले की, एनडीए आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, इंडिया आघाडीची स्थापना फक्त पंतप्रधान मोदींचा विरोध करण्यासाठी झाली आहे. यावर उत्तर देताना आदित्य म्हणाले, हे साफ चुकीचे आहे. इंडिया आघाडीतील पक्षांची विचारसरणी वेगळी आहे. तरीदेखील सर्वांनी एकत्र येऊन आघाडी केली.

ते पुढे म्हणतात, इंडिया आघाडीत सर्वांचा आवाज ऐकला जातो. एकच व्यक्ती सर्व निर्णय घेत नाही. एनडीएमध्ये सर्व निर्णय एकच व्यक्ती घेते. तिथे कुणाचाही आवाज ऐकून घेतला जात नाही. इंडिया आघाडीचा लढा याच विचारसरणीच्या विरोधात आहे. यावेळी आदित्य यांना विचारण्यात आले की, ते 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक? या प्रश्नाच्या उत्तरात आदित्य म्हणाले की, या संदर्भात सर्व निर्णय पक्ष घेईल. पुढील निवडणुकीत महाराष्ट्रात आमचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाBJPभाजपा