शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संवेदनशील सरकारने कामाला लागले पाहिजे; शेतकरी अडचणीत, सुप्रिया सुळेंचा शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 16:30 IST

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही आमची मागणी आहे, असे सुळे म्हणाल्या. तसेच मी हा विषय ताकदीने लोकसभेत मांडेन असे आश्वासनही त्यांनी दिले. 

काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीने नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत, संवेदनशील सरकारने कामाला लागले पाहिजे, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारला लगावला आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लावा आणि जास्तीत जास्त निधी केंद्र सरकारने राज्याला देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही आमची मागणी आहे, असे सुळे म्हणाल्या. तसेच मी हा विषय ताकदीने लोकसभेत मांडेन असे आश्वासनही त्यांनी दिले. 

आरक्षणावर सरकारची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट झाले पाहिजे. निर्णयप्रक्रियेचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. डीसीएम १ आणि डीसीएम २ यांना विचारावे, मुख्यमंत्र्यांना विचारावे. राष्ट्रवादी पक्ष मराठा, मुस्लिम, लिंगायत सर्वांच्या मागे आहे. या सरकारच्या निर्णयात स्पष्टता येत नाहीय. परंतू, राष्ट्रवादीच्या भूमिकेत सातत्य आहे, असेही सुळे म्हणाल्या. 

एका शिक्षकाचा अपमान शाहू, फुले, आंबेडकरांच्या, महाराजांच्या सरकारकडून होत असेल तर यांना सत्तेची मस्ती आली आहे. पक्ष सोडा महाराष्ट्रही शिक्षकाचा अपमान सहन करणार नाही. ती महिला शिक्षक होती, भाजप भ्रष्ट जुमला पार्टी सातत्याने अपमान करत असते, मित्रपक्षांनाही सवय लागलीय, अशी टीका सुळे यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्यावर केली. 

राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक होताना दिसतेय, भाजपच्या खासदारांवर ही दगडफेक झाली. होम मिनिस्ट्रीचा इंटेलिजन्स करतोय काय? वैयक्तिक माझे फडणवीसांशी भांडण नाही, हे भांडण वैचारिक आहे. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे गृह मंत्रालय होते, क्राईम कॅपिटल तेव्हा नागपूर ओळखले जायचे. ते मंत्री असताना क्राईम वाढतो कसा? हे मी नाही डेटा बोलतोय अशी टीका सुळे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर केली. 

संदीप क्षीरसागर कुटुंबाच्या वेदना पाहा. जालन्यातील घटना, अमानुष पद्धतीनं महिलांना मुलांना मारलं, कोण जबाबदार? गृहमंत्रालय काय करतंय? असा सवालही सुळे यांनी केला. तसेच महायुतीत लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला फडणवीस यांनी जाहीर केला यावरही सुळे यांनी मत मांडले. माध्यमांवर दाखवलेला फॉर्म्युला भाजपचा ठरलेला नाहीय. आमचा फॉर्म्युला ठरला की संजय राऊत, नाना पटोले सगळं सविस्तर सांगतील, असे सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेEknath Shindeएकनाथ शिंदेRainपाऊसFarmerशेतकरी