शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा डाव, पश्चिम घाट वाचवण्यासाठी पुढे या राव

By संदीप आडनाईक | Updated: July 28, 2022 15:53 IST

पूर्वी ९७ टक्के जैवविविधता असलेले हे क्षेत्र राजकारण्यांमुळे विकासकामासाठी उपयोगात आणून ही टक्केवारी ३७ वर आली आहे. आता हेही क्षेत्र कमी करण्याचा डाव सुरू आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रांबाबत केंद्र सरकारने सुधारित अधिसूचना काढली असून, तज्ज्ञ समितीच्या शिफारशींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. यात सरकारने नव्याने निश्चित केलेल्या पाच राज्यांतील संवेदनशील क्षेत्र कमी करण्यासाठी राजकारणी सरसावले असून, त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी अवघ्या साठ दिवसांचाच अवधी मिळाला आहे. हे क्षेत्र वाचविण्यासाठी वनस्पती व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी अभ्यासक, विषयतज्ज्ञ, पर्यावरणप्रेेमी यांना योग्य सूचना केंद्र सरकारकडे पाठविण्याचे आवाहन केले आहे.सहा राज्यांत विस्तारलेला पश्चिम घाट जैवविविधतेने समृध्द आणि मुळातच पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र आहे. पूर्वी ९७ टक्के जैवविविधता असलेले हे क्षेत्र राजकारण्यांमुळे विकासकामासाठी उपयोगात आणून ही टक्केवारी ३७ वर आली आहे. आता हेही क्षेत्र कमी करण्याचा डाव सुरू आहे. केरळने यात बाजी मारली असून, महाराष्ट्रही अंशत: यशस्वी झाला आहे. कर्नाटकही चार हजार क्षेत्र वगळावे म्हणून आग्रह धरत आहे.

याबाबतची सुधारित अधिसूचना केंद्र सरकारने ६ जुलै २०२२ रोजी काढली आहे. गॅझेट ऑफ इंडियामध्ये केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने सर्वांसाठी हिंदी व इंग्रजीतून ही नवी अधिसूचना प्रकाशित केली आहे. याबाबतची मते, टीका टिप्पणी, संदेश व सूचना मागविल्या आहेत. ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून ६० दिवसांचा अल्प कालावधी दिला आहे. याबाबत अभ्यासक, विषयतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमींनी आपली आवश्यक मते, सूचना पत्राद्वारे, सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ एनव्हारमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, इंडिया पर्यावरण भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, जोरबाघ रोड, अलिगंज, न्यू दिल्ली, ११००३३ या पत्त्यावर किंवा संकेतस्थळावरच्या ई-मेलद्वारे पाठवण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत पश्चिम घाटातील खाणकामे, उत्खनन, वृक्षताेड, जंगलाचा विनाश, अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे, रस्ते विकास प्रकल्प, चाेरट्या शिकारी व तस्करी आणि अनियंत्रित पर्यटनामुळे पश्चिम घाटाचे आणि तेथील वन्यजीवांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे. पश्चिम घाटात आज अवघे ३७ टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. यामुळेच तेथील पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षण-संवर्धनासाठी पश्चिम घाट परिसरात संवेदनशील क्षेत्राची निर्मिती करणे अत्यावश्यक असल्याने, केंद्र शासनाच्या सुधारित अधिसूचनेस पाठिंबा द्यावा आणि आवश्यक सूचना वेळेत मंत्रालयास पाठवाव्यात. -डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पती व पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरणCentral Governmentकेंद्र सरकार