शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 18:02 IST

Prithviraj Chavan लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी विविध प्रश्नांवर सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. 

कराड - महाविकास आघाडीत कुठेही बिघाडी नाही. आम्ही १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू, सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, साताऱ्यात महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावे लागेल. आम्ही यात कमी पडलो. या निकालाचं विश्लेषण करतोय. सांगलीची परिस्थिती वेगळी आहे. त्याठिकाणी अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या, कार्यकर्त्यांच्या इच्छेविरोधात तिकीट देऊ नये हा धडा सांगलीतून घेण्याचा आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच महाविकास आघाडी ज्या ताकदीनं लोकसभा निवडणूक लढली, त्यापेक्षा अधिक ताकदीने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आता आम्ही १५८ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहोत. आमचा प्रयत्न १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न आहे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

दरम्यान, जर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करून लोकसभा अध्यक्ष ठरवला गेला तर निश्चित त्यांना पाठिंबा दिला जाईल. ही लोकशाहीची परंपरा आहे. परंतु रेटून जर काही चालवायचा प्रयत्न झाला तर आम्हालाही आमचा उमेदवार उभा करावा लागेल. दिल्लीत सभागृहाच्या समन्वयाचं काम करतायेत त्यांनी हे नियोजन केले पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले. 

...म्हणून बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी 

ईव्हीएम खराब असा आरोप कुणी केला नाही. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात जी घटना घडली त्याबद्दल निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. काहीतरी घडल्याशिवाय निवडणूक आयोगाने FIR दाखल केला का? पराभूत उमेदवाराला FIR दिला पाहिजे. आपल्या मोबाईलवर ओटीपी येतो, त्यातून ईव्हीएम उघडलं जातं ही नवी भानगड कुठून आली? पोस्टल बॅलेट हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गोळा करतात हे आम्हाला माहिती नाही. आधी पोस्टल बॅलेटची मोजणी करून ते जाहीर करायला हवेत ते यावेळी निवडणूक आयोगाने केले नाही. त्यामुळे हा आरोप सरसकट ईव्हीएमवर नाही. मुंबई उत्तर पश्चिमबाबत जो काही गोंधळ आहे त्यावर स्पष्टीकरण द्यावे ही मागणी आमची आहे. निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे यासाठी बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी आमची मागणी आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. 

लोकशाही वाचवण्यासाठी NGO चा वापर

लोकशाही वाचवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. कुठलेही नेरिटिव्ह सेट करण्यासाठी सामाजिक संस्था पुढे आल्या नाहीत. केवळ लोकशाही वाचली पाहिजे यासाठी हे झालं. मी सर्व संस्थांचे आभारी मानतो, त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्या देशातील लोकशाही जिवंत राहिली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असं सांगत पृथ्वीराज चव्हाणांनी निर्भय बनोच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालUddhav Thackerayउद्धव ठाकरे