शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

समाजातील सर्व घटकांचे मत घेऊन जातनिहाय जनगणनेबाबत निर्णय घेतला जाईल- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 14:45 IST

महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून येथील संस्कृती आणि परंपरा इतर राज्यांपेक्षा वेगळ्या आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जातनिहाय जनगणनेबाबत देशभरात सतत चर्चा सुरू आहे. विरोधी पक्ष सातत्याने जनगणना करण्याची मागणी करत आहेत. याचदरम्यान, समाजातील सर्व घटकांचे मत घेऊन जातनिहाय जनगणनेबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून येथील संस्कृती आणि परंपरा इतर राज्यांपेक्षा वेगळ्या आहेत. महाराष्ट्रात सर्व समाज आणि जाती एकत्र राहतात, एकत्र काम करतात आणि एकत्र सण साजरे करतात. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचे मत जाणून घेतल्यानंतर जनतेच्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग येथे उपस्थित राहून संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्मारकाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

स्मृती मंदिर परिसर हे एक आमच्यासाठी प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थान आहे. येथे कामाची ऊर्जा मिळते. त्यामुळे येथे नतमस्तक व्हायला आलो. हे सेवा करण्याचे स्थान आहे. त्यामुळे समाजाची सेवा करण्याची प्रेरणा आम्हाला येथून मिळते. मला काय मिळेल? यापेक्षा मी देशासाठी आणि समाजासाठी काय करू शकतो? हा विचार घेऊन आम्ही येथून जात असतो, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडीच्या काळात बंद करण्यात आल्या, त्या विकासाच्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. जनतेला सरकारच्या योजनाचा लाभ व्हावा त्यांच्यामध्ये सुख समृद्धी नांदावी. समाजाच्या शेवटच्या माणसाला सगळ्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही काम करत आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार