शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

...तेव्हा शरद पवारांना बाजूला करण्याचे षडयंत्र रचलं; प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 20:58 IST

इतके मजबूत आणि देश पातळीवर सर्वमान्य नेतृत्व आपल्याकडे असून देखील आपण महाराष्ट्र स्वबळावर कधीच जिंकू शकलो नाही अशी खंत प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.

मुंबई - शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस पवारांना पंतप्रधान करून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांना द्यावे, अशी प्रामाणिक सूचना अनेक नेत्यांकडून आली. पण त्यावेळेस राजकारणामध्ये पवारांना कसं मागे टाकायचे, पवारांसारखा पॉवरफुल व्यक्ती जर देशाच्या राजकारणामध्ये स्थापित झाला तर त्याचे परिणाम वेगळे होतील अशी धारणा काही लोकांच्या मनामध्ये होती. त्यामुळे शरद पवारांना बाजूला करण्याचे षडयंत्र रचले गेले. जे १९९१ मध्ये झाले तेच नंतर १९९६ मध्ये देखील झाले असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केला. 

राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते, यावेळी प्रफुल पटेल म्हणाले की, काँग्रेस पक्षामध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली होती. गांधी घराण्यातील कोणी व्यक्ती त्यावेळेस राजकारणामध्ये नव्हती आणि १९९१ च्या निवडणुकीनंतर दिल्लीमध्ये नेतृत्व कोणी करायचं हा एक मोठा प्रश्न होता. त्यावेळी अनेकांनी शरद पवारांचे नाव सुचवले होते. पण पवार देशपातळीवर स्थिरावले तर त्याचे परिणाम वेगळे होतील अशी भीती काहींच्या मनात होती असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज आपला वेगळा पक्ष आहे आणि शरद पवार आपले नेते, आपला स्वाभिमान आहेत. पण एक खंत जी अजितदादांनी देखील सांगितली की इतके मजबूत आणि देश पातळीवर सर्वमान्य नेतृत्व आपल्याकडे असून देखील आपण महाराष्ट्र स्वबळावर कधीच जिंकू शकलो नाही किंवा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकलो नाही. ही आपल्या सर्वांसाठी शोकांतिका आहे असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं. 

दरम्यान, १९९९ मध्ये आपला पक्ष स्थापन झाल्यानंतर आपण याच षण्मुखानंद हॉलपासून सुरूवात केली. नंतरच्या पहिल्या निवडणुकीत आपले ५८ आमदार निवडून आले होते. एकूण ९ खासदार होते.  स्व. अटल बिहारी वाजपेयीजींनी त्यावेळेस पवार साहेबांना दिल्ल्लीमध्ये एनडीए सरकारसोबत येण्याची ऑफर दिली पण पवारांनी मला सांगितले की त्यांची ऑफर जरी चांगली असली तरीदेखील आपल्याला बीजेपीसोबत जायचे नाही. असा निर्णय पवारांनी त्यावेळेस घेतला होता अशी माहितीही प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिली.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस