शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

राज्यात हवामान बदलामुळे नऊ महिन्यांत १९९ बळी; स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 00:21 IST

हवामानातील बदलामुळे स्वाइन फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.

मुंबई : हवामानातील बदलामुळे स्वाइन फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.बदलते हवामान आणि त्यामुळे होणाऱ्या विषाणूंचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये. औषधोपचारानंतर २४ तासांत बरे वाटले नाही, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी केले आहे.राज्यात ठिकठिकाणी स्वाइन फ्लू संशयित १६ हजार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर खासगी तसेच महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हेंटिलेटरवर असलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर करायच्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा प्रोटोकॉल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हा प्रोटोकॉल राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना तसेच महापालिकेच्या रुग्णालयांना पाठविण्यात येईल. त्यानुसार त्यांनी स्वाइन फ्लूबाधित रुग्णांवर उपचार करणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यात खासगी रुग्णालयांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचे डेथ आॅडिट रिपोर्ट प्राप्त होत आहेत. त्यानुसार औषधोपचारास विलंब हे मृत्यूचे एक प्रमुख कारण आढळून येत आहे. त्यामुळे सर्दी, ताप, घसादुखी २४ तासांत बरी न झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लू गोळ्यांचा डोस सुरू करावा. कुठल्याही परिस्थितीत आजार अंगावर काढू नका. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.उपचार वेळेत सुरू न केल्याने मृतांची संख्या वाढलीहवामानात बदल झाल्याने आजार बळावतात. मात्र, काही रुग्णांनी स्वत: सर्दी, तापावर गोळ्या औषध घेऊन आजार अंगावर काढला आहे. स्वाइन फ्लूवरील उपचार वेळेत सुरू न केल्याने मृतांची संख्या वाढली असल्याची माहितीही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी या वेळी दिली.

टॅग्स :deepak sawantदीपक सावंतMaharashtraमहाराष्ट्र