शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मथुरा येथे अडकून पडलेले 95 वारकरी महाराष्ट्रात सुखरूप परतले; डॉ. नीलम गोऱ्हेंच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 22:01 IST

परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने स्वच्छता व आरोग्यविषयक दक्षता घेऊन  हाताळणे आवश्यक होते. त्यानुसार  नियोजन करण्यात आले. 

मुंबई : कोरोनामुळे देशातील तसेच राज्यातील नागरिक विविध ठिकाणी अडकून बसले आहेत. असेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे नागरिक मथुरा येथे अडकल्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांना २७ मार्च, २०२० रोजी दूरध्वनीद्वारे हभप वास्कर महाराज व उखळीकर महाराज पंढरपूर यांनी कल्पना दिली. यांसदर्भात उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ उपसभापती कार्यालयीन खाजगी सचिव व विशेष कार्यकारी अधिकारी यांना अडकलेल्या वारकऱ्यांना सोडविण्याबाबत उपयोजन करण्यास आदेश दिले. त्यानुसार या अधिकारी यांनी २७ पासून उत्तर प्रदेश गृहविभाग, जिल्हाधिकारी मथुरा, तसेच मध्य प्रदेश गृहविभाग यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने स्वच्छता व आरोग्यविषयक दक्षता घेऊन  हाताळणे आवश्यक होते. त्यानुसार  नियोजन करण्यात आले. या वारकऱ्यांना प्रवास करण्यासाठी कोणाकडे संपर्क साधायचा याबाबत काहीच ज्ञान नव्हते, वृदांवन मथुरा येथून निघण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, रस्त्यात रहाण्याची व्यवस्था नव्हती तसेच  विविध राज्याच्या प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य नसल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते. परंतु डॉ. नीलम गोऱ्हे  उपसभापती यांनी त्यांना धीर दिला आणि प्रशासनांशी संवाद साधून त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले व सातत्याने तसे काम केले. उपसभापती कार्यालयाच्या पाठपुराव्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून त्यांना मदत मिळण्यास सुरवात झाली आणि त्यांना मायेची साथ मिळाल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आले. या वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवाससाठी दोन ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली तर यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काल  २९ मार्च, २०२० रोजी त्यांचे वृन्दावन येथे  हेल्थ चेकअप करून त्यांना उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात आणण्याबाबतच्या प्रवासाची परवानगी मिळाली.यात उपसभापती कार्यालयातील अधिकारी सचिन चिखलीकर हे वारकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांना मायनगरीत आणण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. आज  ३० मार्च, २०२० रोजी पहाटे त्यांचे परळी वैजनाथ येथे आगमन झाले असून त्यांचे तेथे पुन्हा मेडिकल चेकअप केले जात असून त्यांना मेडिकल अधिकारी यांच्या निगरानी ठेवण्यात आले असून लवकरच त्यांचे पंढरपूर येथे आगमन होईल. या संपूर्ण संवेदनशील वातावरणात डॉ. नीलम गोऱ्हेंनी वारकऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना महाराष्ट्र मध्ये आणण्यात केलेल्या प्रयत्नाबद्दल वारकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या