शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दहा जिल्ह्यांत ९५ हजार हेक्टरला फटका; आचारसंहितेमुळे मदतीविना शेतकऱ्यांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:01 IST

पावसामुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: मान्सून राज्यातून परतला असला तरी बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्याचा फटका प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात व मका या पिकांना बसला आहे. राज्यात १ ते २१ ऑक्टोबरपर्यंत १० जिल्ह्यांत ९५ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना फटका बसला.  सध्या आचारसंहिता असल्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात दुरापास्त झाला आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल ९४ हजार ५४३ हेक्टरवरील पिकांचे  नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अहवालात नोंद नसल्याने शेतकरी संतप्त

या पावसामुळे सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला असून, जिल्ह्यातील ६४ हजार ९०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागांमध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांसह नाशिक, नंदूरबार, सांगली, बुलढाणा व भंडारा या १० जिल्ह्यांमधील पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे तसे, विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांमधील पिकांचेही खूप नुकसान झाले असून त्याबाबत अहवालात नोंद नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

शेतकरी त्रस्त अन् नेते निवडणुकीत व्यस्त

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने पंचनाम्यांचे काम जवळपास बंद आहे. त्यामुळे पंचनाम्यांचा अहवाल राज्य सरकारकडे पोहचून त्यावर निर्णय केव्हा होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच पंचनाम्यानंतर जाहीर करण्यात येणारी मदत आचारसंहितेत अडकणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला निर्णय घेता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हातचे पीक तर गेलेच मात्र, मदतही मिळणार नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यंदा कडू होणार आहे.

परतीच्या पावसामुळे राज्यात काढणीला आलेल्या पिकांसह फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कीड रोगांमध्येही वाढ झाली आहे.

नुकसानीची आकडेवारी

जिल्हा    क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • ठाणे    ५४१.४० 
  • पालघर    २७२३.४१ 
  • रायगड    ४७१.१० 
  • रत्नागिरी    ९५.२० 
  • सिंधुदुर्ग    ६५९२ 
  • नाशिक    ६४९०२.७६ 
  • नंदूरबार    २७९.८५ 
  • सांगली    २४२४.३० 
  • बुलढाणा    १५२३३.७० 
  • भंडारा    १२८०
टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र