शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

दोन महिन्यांत मुंबईत मलेरियाचे ९०० रुग्ण

By admin | Updated: May 29, 2014 03:21 IST

पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित आहे.

मुंबई : पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये मुंबई शहरामध्ये मलेरियाचे ९०० हून अधिक रुग्ण आढळले असून, पाच महिन्यांमध्ये २ हजार १०० मलेरियाचे रुग्ण आढळल्याचे संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. मुंबई शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पावसाला सुरुवात झाली की, मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांची आकडेवारी चढती असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच एप्रिल महिन्यामध्ये ५२५ तर मे महिन्यामध्ये ४०० मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या कालावधीतील गेल्या वर्षीच्या मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत यंदा रुग्ण कमी असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. जानेवारी ते मे २०१४ या कालावधीमध्ये मलेरियाचे एकूण २ हजार १०० रुग्ण आढळून आले आहेत. मलेरिया हा पावसाळी आजार नाही. वर्षभरामध्ये मलेरियाचे रुग्ण आढळतच असतात. पावसाळ्यासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याची सुरुवात ७ एप्रिल आरोग्य दिनापासूनच करण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली की, दरवर्षीप्रमाणे आठवड्याचे पावसाळी कॅम्प सुरू करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारची तयारी झाली असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये उन्हाळा जास्त वाढलेला होता. यामुळे मुंबईकर आजारी पडण्याचे प्रमाण वाढले होते.