शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

बापरे! 80 वर्षांच्या वृद्धाला तब्बल 80 कोटींचे वीज बिल पाठविले; आजोबांना थरमरीच भरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 17:02 IST

Electricity bill Shock to old man Ganpat Naik : नालासोपाऱ्याच्या निर्मल गावात राईस मिल चालविणाऱ्या एका 80 वर्षांच्या वृद्धाला सोमवारी विज वितरण कंपनीने १० पंधरा हजार नव्हे तर चक्क 80 कोटींचे बिल पाठवून दिले आहे. हा आकडा पाहताच हे मिल मालक गणपत नाईक यांचे डोळेच पांढरे झाले.

राज्यात महावितरणने थकबाकी असलेल्यांची वीज खंडीत करण्याची कारवाई सुरु केली आहे. कोरोना लॉकडाऊन काळात अव्वाच्या सव्वा बिले काढून सामान्यांना वेठीस धरले आहे. राज्यभरात आता वसुली सुरु केली असून वीज जाण्याच्या भीतीने लोक हळूहळू का होईना हप्त्यांमध्ये ही बिले भरू लागले आहेत. अशातच मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक खळबळजनक बातमी आली आहे. ( 80-year-old Ganpat Naik, who runs a rice mill in Nirmal village of Nalasopara town, Maharahstra on Monday received a whopping electricity bill of over Rs 80 crore)

नालासोपाऱ्याच्या निर्मल गावात राईस मिल चालविणाऱ्या एका 80 वर्षांच्या वृद्धाला सोमवारी विज वितरण कंपनीने १० पंधरा हजार नव्हे तर चक्क 80 कोटींचे बिल पाठवून दिले आहे. हा आकडा पाहताच हे मिल मालक गणपत नाईक यांचे डोळेच पांढरे झाले. उच्च रक्तदाब असल्याने त्यांना थरमरी भरली. यामुळे त्यांना हॉस्पिटलाईज करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

2001 पासून त्यांची तांदळाला पॉलिश करण्याची मिल आहे. तेव्हापासून कधी 6 कधी सात हजार तर कधी पन्नास हजार असे वापरानुसार बिल यायचे. ते गणपत नाईक नियमित भरत होते. मात्र, कोरोना काळापासून त्यांची मिल बंद होती. त्यांनी त्यातील मशिनरीदेखील विकल्याने मिल रिकामी आहे. तरीदेखील त्यांना 80 कोटींचे बिल महावितरणने (Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL)) पाठविल्याने धक्का बसला आहे. 

यावर महिवितरणला विचारले असता त्यांनी ही तांत्रिक चूक असल्याचा खुलासा केला आहे. तसेच गणपत नाईंकांचे वीज बिल हे 80 कोटी नाही तर 6,400 रुपये असल्याची सारवासारव केली आहे. गणपत नाईक हे बिल भरतीलही, परंतू त्यांना जो मानसिक त्रास, ताण सहन करावा लागला, त्यांचे जे नुकसान झाले ते कोण भरून देणार असा प्रश्न पडला आहे. 

महावितरण कंपनीकडून लॉकडाऊनकाळात अवाढव्य वीज बिले देण्यात आली असून या बिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. बिल अदा न करणाऱ्या नागरिकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. हा प्रकार संतापजनक असून सरकारने तो तातडीने थांबवावा, अन्यथा जनतेतून उद्रेक होईल, असा इशारा भाजपाने दिला आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज