शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

लेदर कारखान्यांचे ८० टक्के सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:21 IST

धारावी पुनर्विकास प्रकल्प: जमीनमालक अनुत्सुक; पुन्हा सहभागी होण्यासाठी संधीची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: चर्मोद्योगाशी संबंधित सुमारे पाच ते सहा हजार उद्योग प्रकल्प धारावीमध्ये असून, त्यात टॅनिंग, कारखाने, कार्यशाळा आणि किरकोळ विक्रीचा समावेश आहे. यातील सुमारे ८० टक्के युनिट्स (लेदरचे कारखाने) चे सर्वेक्षण धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पूर्ण झाले आहे. मात्र, काही कारखाने आणि कार्यशाळा खासगी जमिनींवर असल्यामुळे जमीनमालकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे  त्यांचे सर्वेक्षण बाकी आहे.  मात्र, तरीही सरकारने आमचे म्हणणे ऐकावे आणि पुन्हा सर्वेक्षणात सहभागी होण्याची संधी द्यावी, असा सूर व्यावसायिकांनी लावला आहे.

चर्मोद्योग ‘प्रदूषणकारक’ वर्गात मोडतो. चामडे प्रक्रिया कारखान्यांमुळे (टॅनरीज) ही चिंता अधिक आहे. मात्र काळा किल्ला रोड येथील आलिम यांनी सांगितले की, धारावीमध्ये ९५ टक्के टॅनरीज बंद झाल्या आहेत. उरलेल्या पाच टक्के टॅनरीजसाठीही तोडगा निघू शकतो. आमच्या गोदामांमध्येही रसायन वापरले जात नाही. 

‘आमच्याशी संवाद साधा’व्यावसायिक नरेंद्र यांनी सांगितले की, आमच्या भागात किमान १० कारखाने आहेत. मी एकटा २० कारखान्यांकडून साहित्य खरेदी करतो. सरकारने आमच्याशी संवाद साधावा. आम्ही मिळून यावर तोडगा काढू.

व्यवसायात मंदीसूरज गुप्ता म्हणाले की, पुनर्विकासामुळे संधी मिळतील. मात्र, सध्या बाजार मंदावलेला आहे. पूर्वी कामगारांचे पगार भरल्यानंतर निव्वळ कमाई ३० हजार रुपये महिन्याला होती. आता सर्व ऑनलाइन विकले जात असल्यामुळे अडचणीत सापडलो आहोत. 

समावेशक विकास आणि दीर्घकालीन शाश्वततेवर आमचा भर आहे. पाच वर्षांसाठी ‘एसजीएसटी’ परतावा देतानाच आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम टाऊनशिप  उभारत आहोत. ते स्थानिक उद्योगांना वाढवण्यास मदत करतील, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास म्हणाले.

धारावीतच व्यवसायासाठी जागा देण्यात आली तरी ती मॉलमध्ये असेल का? सरकार किंवा ‘डीआरपी’ने या बाबतीत उत्तर दिल्यास दिलासा मिळेल. मुंबईतील अनेक मॉल्स फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. पुनर्विकासाला विरोध नाही. तो आवश्यक आहे. पण त्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करावा लागेल, असे दीपक काळे म्हणाले.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र