शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

राज्यात सरासरीच्या ७६.८ टक्के पाऊस : कृषी विभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 20:48 IST

पुणे : राज्यावर दुष्काळाची छाया गडद झाल्याचे कृषि विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. औरंगाबाद,लातूर,उस्मानाबाद,बीड यांसह राज्यातील १३ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यात २५ ते ५० टक्के ,१४३ तालुक्यात ...

ठळक मुद्देमराठवाड्याची स्थिती चिंताजनक, २०० हून अधिक तालुक्यांत पाणी परिस्थिती गंभीरऔरंगाबाद,लातूर,उस्मानाबाद,बीड यांसह राज्यातील १३ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस पिकनिहाय दुष्काळी भागातील शेतक-यांना आर्थिक मदत६४ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस

पुणे: राज्यावर दुष्काळाची छाया गडद झाल्याचे कृषि विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. औरंगाबाद,लातूर,उस्मानाबाद,बीड यांसह राज्यातील १३ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यात २५ ते ५० टक्के ,१४३ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.१२१ तालुक्यात ७५ ते १०० पाऊस पडला आहे. केवळ ६३ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. राज्यातील सरासरी पाऊस १ हजार १४२ मिलिमीटर असून ५ आॅक्टोबरपर्यंत ८७७ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ७६.८ टक्के पाऊस झाला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने मराठवाड्याची स्थिती चिंताजनक आहे. औरंगाबाद विभागात एकूण २८ तालूक्यांपैकी ५ तालुक्यात २५ ते ५० टक्के तर २१ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला आहे.विभागात पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे कापूस पिकावर रस शोषणा-या किडीचा व शेंदरी बोंडअळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे.लातूर विभागात ४८ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात २५ ते ५० टक्के २६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.नागपूर विभागातील तापमानात किंचित वाढ झाली असून विभागातील ६४ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विभागात कापूस पिकावर रस शोषणारी किडीचा व शेंदरी बोंडअळीचा,भात पिकावर काही ठिकाणी पिवळा खोडकिडा आणि करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे..................वेळेवर पाऊस न झाल्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. १९६३ मध्ये राज्य शासनाने दुष्काळ शब्द काढून टाकला आहे.त्यामुळे दुष्काळी स्थितीनंतर प्रत्येक वेळी केंद्र शासनावर अवलंबून राहावे लागते.त् रिझर्व बँकेच्या अनेक योजनांचा लाभही मिळत नाही.त्यामुळे राज्य शासनाने आपल्या कार्यकक्षेत दुष्काळ शब्दाचा अंतर्भाव करण्यासाठी परिपत्रक काढावे. पिकनिहाय दुष्काळी भागातील शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी.जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करून आजारी नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.-बुधाजीराव मुळीक,ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसagricultureशेतीState Governmentराज्य सरकार