ठाण्यातून एसटीच्या ७५७ जादा बसेस
By Admin | Updated: September 2, 2015 01:49 IST2015-09-02T01:49:12+5:302015-09-02T01:49:12+5:30
गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

ठाण्यातून एसटीच्या ७५७ जादा बसेस
ठाणे : गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्या सर्व जिल्ह्यातील चार आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी समूहाने गाड्यांचे आरक्षण करणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी जादा बस देण्यात आल्या आहेत. यंदा १२ ते १६ सप्टेंबरपासून त्यांचे नियोजन केले आहे. यात १२ सप्टेंबर रोजी ६ गाड्या सोडल्या जाणार असून, १३ सप्टेंबर रोजी २६, १४ सप्टेंबरला ९५, १५ सप्टेंबरला ५०८ तर १६ सप्टेंबर रोजी १२२ गाड्या सोडल्या जाणार आहेत.
ठाणे-१ व बोरीवलीतून या पाच दिवसांच्या काळात २७१, भार्इंदरमधून ३७ तर ठाणे आगार-२च्या मध्यवर्ती बस स्थानकातून १९२, मुलुंड पूर्वमधून २२ तर भांडुप पश्चिममधून ९३ गाड्या सोडण्यात येणार आहेत.
याशिवाय, कल्याण आगारातून ३८ तर विठ्ठलवाडीतून १०४ बस सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती ठाण्याचे विभागीय वाहतूक अधिकारी ए.आर. कचरे यांनी दिली.
३१ आॅगस्टपर्यंत समूहाने ३९३, आॅनलाइन ३३२ तर इतर ३२ अशा ७५७ जादा बसेसचे नियोजन झाल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)